BJP Leader Pass Away : राजकीय वर्तुळात शोककळा ! भाजपच्या ‘या’ दिग्ग्ज नेत्याचे निधन
उत्तरप्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी (BJP Leader Pass Away) समोर आली आहे.

BJP Leader Pass Away : उत्तरप्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी (BJP Leader Pass Away) समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार तथा माजी राज्यमंत्री अनिल शर्मा यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर अशा कर्करोगाशी (कॅन्सर) लढा देत होते.
दिल्लीतील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची ही जीवन-मृत्यूची झुंज थांबली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर (BJP Leader Pass Away) मतदारसंघाचे आमदार असलेल्या अनिल शर्मा यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय विश्वात मोठी शोककळा पसरली आहे.
अनिल शर्मा यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भावना व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, माजी राज्यमंत्री आणि शिकारपूरचे विद्यमान आमदार अनिल शर्मा यांच्या निधनाची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना आहे की, दिवंगत पुण्यात्म्यास आपल्या श्रीचरणी स्थान मिळावे आणि या कठीण काळात त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना हे असीम दुःख पेलण्याची शक्ती मिळो.
बुलंदशहरमधील सुरजावली गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनिल शर्मा यांनी अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवले होते. तरुण वयातच गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड केली होती. ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे राज्याच्या राजकारणात एका प्रभावशाली नेत्याच्या रूपात बहरला.
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची (BJP Leader Pass Away) मुख्य सुरुवात बहुजन समाज पक्षातून (बसपा) केली. २००२ मध्ये त्यांनी खुर्जा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकी जिंकली आणि २००७ मध्ये सलग दुसऱ्यांदा या विजयाची पुनरावृत्ती केली. २०१२ च्या निवडणुकीत शिकारपूरमधून त्यांना पराभवाचा धक्का बसला, परंतु त्यांनी हार मानली नाही.
बदलत्या राजकीय समीकरणांनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर शिकारपूरमधून दणदणीत विजय मिळवत त्यांनी पुनरागमन केले. त्यांच्या कामाची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे वन आणि पर्यावरण राज्यमंत्रिपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा (BJP Leader Pass Away) मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. तळागाळातील कार्यकर्ता ते यशस्वी मंत्री असा प्रेरणादायी प्रवास गाठणाऱ्या या नेतृत्वाच्या अकाली जाण्याने एका संघर्षशील अध्यायाचा अंत झाला आहे.





