BJP State Presidents : मोठी बातमी..! भाजपकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा; संसदीय मंडळातही बदलांचे संकेत
BJP State Presidents : केंद्रात सत्ता राखल्यानंतर आता भाजप पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.

BJP State Presidents : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाला मिळालेल्या यशानंतर आता केंद्रातील मोदी सरकार तसेच भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि त्रिपुरा या चार राज्यांसाठी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. (BJP State Presidents)
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवरही बदल होण्याचे संकेत दिले जात आहेत. (BJP State Presidents)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करत पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा संदेश दिला आहे. दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबची धुरा केवल सिंग ढिल्लन यांच्याकडे सोपवण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. (BJP State Presidents)
हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी अर्चना गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्रिपुराची जबाबदारी अभिषेक देबरॉय यांच्याकडे देण्यात आली आहे. संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाला पुढे आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. (BJP State Presidents)
दरम्यान, पक्षासोबतच केंद्र सरकारमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला आरक्षण आणि महिलांच्या प्रतिनिधित्वाला अधिक चालना देण्यासाठी मंत्रिमंडळात आणि राज्यसभेत महिला नेत्यांना अधिक संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. (BJP State Presidents)
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या संसदीय मंडळाची पुनर्रचना तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना प्रशासनात नवीन ऊर्जा निर्माण करणे आणि पक्षातील काही नाराजी दूर करणे, हा या संभाव्य फेरबदलामागील उद्देश असल्याचे मानले जात आहे. (BJP State Presidents)
अधिक मास संपल्यानंतर म्हणजेच १५ जूननंतर या घडामोडींना वेग येऊ शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत भाजप आणि एनडीएच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. (BJP State Presidents)




