मुंबई – बीसीसीआयने ( BCCI ) नवोदितांची बांधणी करत आगामी काळातील भारताच्या टी-20 संघाबाबत मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अन्य काही खेळाडूंना टी-20 संघातून आपले स्थान गमवावे लागेल, असे सूचक वक्तव्यही बीसीसीआयच्या सूत्रांनी केले आहे.
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली. त्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) क्लिनअप मोहीम उघडल्यासारखे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली. इतकेच नव्हे तर नवोदितांना जास्तीत जास्त संधी देण्याचा उद्देशही स्पष्ट केला.
त्यामुळे संघात रोहित, कोहलीसह आणखही काही खेळाडूंना पुढील काळातही संधी देण्यापेक्षा सेकंड बेंचला अनुभव यावा यासाठी नवी रचना तयार केली जात आहे. याच रचनेनुसार येत्या काळात या वरिष्ठ खेळाडूंना टी-20 संघाच्या निवडीदरम्यान विचारात घेतले जाणार नाही असेही संकेत देण्यात आले आहेत.
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
कोहलीने दिले संकेत
विराट कोहलीला ही कल्पना यापूर्वीच आल्याचे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून लक्षात येत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपला एक फोटो पोस्ट करत या आठवणी कायम स्मरणात राहतील अशी कॅप्शनही टाकली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 विश्वकरंडक सामन्यात केलेल्या आफलातून खेळीनंतर कोहली ड्रेसिंग रूममकडे परतत असल्याचा हा फोटो आहे. त्यामुळे कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करेल असे मत चाहत्यांनीही व्यक्त केले आहे.
पंड्याकडेच राहणार नेतृत्व
भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडेच राहणार असल्याचेही सुतोवाच बीसीसीआयने ( BCCI ) केले आहे. पंड्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. यंदाच्या पहिल्याच मोसमात त्याने संघाला विजेतेपदही मिळवून दिले. तसेच आता न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेतही त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने मालिका विजय मिळवला. त्यामुळे येत्या काळात तोच भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करेल, असेही सांगितले जात आहे.