मुंबई – भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णि लागण्याची शक्यता बीसीसीआयच्या ( BCCI ) सुत्रांकडून वर्तवली जात आहे. माजी कसोटी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्यासह संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्यावर बीसीसीआयने नव्याने या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. शर्मा यांची नियुक्ती होत असताना गेल्या वर्षीपासूनच आगरकर यांचे नाव चर्चेत होते.
#NZvsIND2022 | उद्याच्या टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट, ‘असे’ राहील हवामान!
ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समितालाच बीसीसीआयने ( BCCI ) घरचा रस्ता दाखवला आहे. आता येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत इच्छूक व्यक्तींचे अर्ज मागवण्यात आले आहेत.
यातूनच नव्या अध्यक्षांसह निवड समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. चेतन शर्मा (उत्तर विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग) व देवाशिष मोहंती (पूर्व विभाग) असे सदस्य होते. ऍबी कुरुविल्ला यांची मुदत संपल्यामुळे तसेच नवा सदस्य नेमला गेला नाही म्हणून शर्मा यांच्या समितीत पश्चिम विभागाचा सदस्य नव्हता.
#NZvsIND2022 | उद्याच्या टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट, ‘असे’ राहील हवामान!
गेल्या वेळी देखिल आगरकर यांनी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना पद मिळाले नव्हते. यंदा मात्र त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता बळावली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या आगरकर यांनी बीसीसीआयचे निकष पूर्ण केलेले आहेत. त्यांनी देशाकडून 26 कसोटी, 191 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.
बीसीसीआयचे ( BCCI ) निकष
– अध्यक्ष होण्यासाठी किमान सात कसोटी खेळणे आवश्यक
– आंतरराष्ट्रीय स्तरावर बलाढ्य संघांविरुद्ध किमान 30 सामने खेळलेले गरजेचे
– किमान 10 एकदिवसीय सामने खेळलेले असावेत
– निवृत्ती स्वीकारून किमान पाच वर्षे झालेली असावीत
– बीसीसीच्या कोणत्याही समितीचा सध्या सदस्य नसावा
– नियुक्ती झाल्यावर सलग पाच वर्षे कार्यरत राहणे गरजेचे