Dhirendra Shastri Controversy: बागेश्वर बाबांच्या विधानामुळे वाद पेटला! शिवरायांच्या पराक्रमाबद्दल केलेल्या दाव्यांमुळे राज्यभरातून संताप व्यक्त
Dhirendra Shastri Controversy:

Dhirendra Shastri Controversy: नागपूरच्या जामठा येथील भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
महाराजांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या संघर्षांबद्दल शास्त्रींनी केलेल्या दाव्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. यावरून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. अनेक ठिकाणी बागेश्वर बाबांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली.
यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात.
रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून त्या लोककथा तयार होत असतात. जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.’ Dhirendra Shastri Controversy
धीरेंद्र कृष्ण शास्त्री नेमकं काय म्हणाले?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धांनी आणि संघर्षांनी थकले होते. ते एकदा समर्थ रामदास स्वामींकडे गेले, आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवला आणि म्हणाले की, आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही, हे राज्य तुम्हीच सांभाळा. जेव्हा महाराजांनी राज्य सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा समथर्थांनी त्यांना विचारले की, ‘शिष्याचे कर्तव्य काय?’.
त्यावर महाराजांनी आज्ञा पाळणे असे उत्तर दिले. त्यानंतर समर्थांनी तो मुकुट पुन्हा महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि सांगितले की, ‘राज्य माझे असेल, पण ते चालवण्याची जबाबदारी तुझी असेल.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर इतिहासाचा चुकीचा संदर्भ दिला गेल्याची भावना निर्माण झाली आहे. Dhirendra Shastri Controversy
हेही वाचा:






