Bachu Kadu – प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) हे 29 ऑक्टोबर रोजी अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयीची माहिती बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान 15 ऑक्टोबरला मुंबईत बच्चू कडू यांनी “मेरा देश, मेरा खून’ या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचा दुसरा टप्पा हा अयोध्येमध्ये (Ayodhya) होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही हजारोंच्या संख्येने अयोध्येला जाणार आहोत. या सरकारला बुद्धी दे ही प्रार्थना आम्ही प्रभू श्रीरामाकडे करु. शेतकऱ्यांचा विचार करणारे आणि त्यांच्या हिताचे सरकार यावे, असे मागण आम्ही तिकडे मागू.
अयोध्येमधील शहिदांचे स्मारक व्हावे. यासाठी देखील आम्ही जात आहोत, असे कडू यांनी यावेळी म्हटले आहे. आमचे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे की सरकारच्या बाजूने आहे हे सरकारने शोधावे.
आम्ही मागणी करत आहोत. सरकारमध्ये आहे म्हणून मागणी करू नये, असा काही कायदा नाही. सरकारला वाटले की हे आंदोलन विरोधात आहे. तरी त्याची तमा नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.