तुरुंगातून बाहेर पडताच सदावर्ते म्हणतात,’भारत जितेगा,जुर्म हारेगा’, जुलुम कधी टिकत नसतो, जुलुम पराभूत होत असतो”

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलना प्रकरणी आरोपी असलेले आणि छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली ऍड.गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यांना आज कोठडीतून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जेलमधून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्हिक्ट्रचे साईन दाखवत घोषणाबाजी केली.
गुणरत्न सदावर्ते यांनी बाहेर पडताच,’भारत जितेगा, जुर्म हारेगा’, जुलुम कधी टिकत नसतो, जुलुम पराभूत होत असतो, असे म्हणत व्हिक्ट्रीचे साईन दाखवले . सदावर्ते यांना दिलासा मिळणार की अडचणी वाढणार याचा फैसला काही वेळात होणार आहे.
मुंबई, साताऱ्या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांनी खबरदारी मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. मोठा पोलीस फौजफाटा हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून येत आहे.





