Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता आणि कपूर घराण्याचा मुलगा अर्जुन कपूरला त्याच्या आडनावामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्वतः ही गोष्ट सांगितली. यावेळी तो त्याच्या वाईट भूतकाळाबद्दलही बोलला. आईच्या गैरहजेरीपासून ते आई-वडिलांच्या घटस्फोटापर्यंत सर्व गोष्टींबद्दल तो मोकळेपणाने बोलला, एवढेच नाही तर मलायका अरोराच्या ब्रेकअपनंतरही त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं यावर देखील तो खूपच काही बोलला. एका प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये अर्जुन कपूरने त्याचा भूतकाळ, कुटुंब, प्रेम आणि चित्रपटांबद्दल सांगितले. ‘कपूर’ या आडनावामुळे आपल्याला कमी लेखले जात असल्याचे त्याने सांगितले. असे बरेच लोक होते ज्यांना तो अयशस्वी होऊ इच्छित होता. पण आज त्याची आई हयात असती तर तिला त्याचा नक्कीच अभिमान वाटला असता. यावेळी अर्जुन कपूरने सांगितले की, ‘तो 10 वर्षांचा असताना त्याला त्याच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा सामना करावा लागला. वडील बोनी कपूर हे बॉलिवूडच्या दिवंगत श्रीदेवीच्या प्रेमात होते. अर्जुन कपूर म्हणाला, ‘मी 10 वर्षांचा असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. ते मला वाचवेल असे वाटले नव्हते. पण खऱ्या आयुष्यात मी या सगळ्यातून जात होतो, त्यामुळे त्याचा परिणाम झाला. ते माझ्या मनाला खूप लागलं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा अनेक गोष्टी दिसतात…’ अर्जुन कपूरनेही वडिलांसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘उदाहरणार्थ, माझे वडील त्यावेळी दोन मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त होते. त्यांच्यावर सुद्धा खूप दबाव होता. त्यामुळे आमचे नाते सामान्य नव्हते. ते घरी यायचे आणि मला शाळेत सोडायचा आणि पुन्हा घरी घेऊन सोडायचे. त्यांनी प्रयत्न केला नाही असे नाही. असं देखील तो यावेळी बोलला. वडील बोनी कपूर यांच्या श्रीदेवीसोबतच्या लग्नावर अर्जुन कपूर म्हणाला, ‘मला लवकरच जबाबदारी वाटू लागली. लवकर परिपक्व. कारण मला माझ्या आई-वडिलांसोबतचे नाते तुटायचे नव्हते. म्हणून मी गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते खूश होते त्यामुळे मलाही काही त्रास झाला नाही. लहान वयात मी खूप काही शिकलो. ठीक आहे, जे काही केले आहे ते केले आहे. अश्या अनेक गोष्टी यावेळी अभिनेत्यानं बोलावून दाखवल्या. मलायकाबद्दल काय म्हणाला… याच मुलाखतीत अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कसा काळ होता आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्याने कशी साथ दिली या प्रश्नाचे उत्तरही दिले. तो म्हणाला, ‘जेव्हा बाबा, खुशी आणि जान्हवी कपूरसोबत घडले तेव्हाही मी स्वत:ला रोखू शकलो नाही. मलायकाच्या वडिलांबद्दलही ऐकून मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी एक भावनिक बंध निर्माण केला आहे. माझा त्यावर विश्वास आहे. ते मला बोलावतील आणि मी जाईन. वाईट काळात मी साथ देईन. जेव्हा मी एखाद्याशी कनेक्ट होतो तेव्हा मी त्यांच्याशी जोडतो. सदैव साथ देतो.