Annasaheb Dange : डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर संपन्न
प्रवाहाच्या विरोधात संघर्ष करून देदीप्यमान यश मिळवणारे डॉ. अण्णासाहेब डांगे (Annasaheb Dange) एकमेव नेते आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात आयुष्यभर भक्कमपणे उभे राहणे त्यांनी कर्तव्य मानले.

Annasaheb Dange : प्रवाहाच्या विरोधात संघर्ष करून देदीप्यमान यश मिळवणारे डॉ. अण्णासाहेब डांगे (Annasaheb Dange) एकमेव नेते आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात आयुष्यभर भक्कमपणे उभे राहणे त्यांनी कर्तव्य मानले. तळागाळातील माणूस, शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. सर्वसामान्य कुटुंबातील माणसं समाजकारण व राजकारणात पुढे पाहिजेत यासाठी त्यांचा अट्टाहास सुरु आहे.
डांगे (Annasaheb Dange) कॅबीनेट मंत्री असताना राज्यात अनेक पाणीपुरवठा योजनांना गती मिळाली आहे, असे मत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण व रक्तदान शिबिर कार्यक्रमात बोलत होते.
माजी आमदार भगवानराव साळुंखे, सी. बी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार सदाभाऊ खोत व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते झाले.
यावेळी भगवानराव साळुंखे, सी. बी. पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, सागर मलगुंडे, रयत क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उथळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दि. बा. पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव विश्वनाथ डांगे, भानुदास वीरकर, अँड. संतपराव पाटील, राजवर्धन पाटील, बाळासाहेब कोळेकर, संदीप माने, पै. जयकर कदम, सी. एच. पाटील, डॉ. सतीश बापट, संजय हवलदार, नंदकिशोर नीळकंठ, नंदकुमार पाटील, डी. वाय. तांदळे, प्रकाश कनप, तानाजीराव माने, एस. पी. पाटील, सर्जेराव यादव, राजेश माने, मंगलताई कणप, विद्या करे, अभिजित रासकर, अमोल वीरकर, प्रशांत पाटील, जयकर निकम, अर्जुन धोत्रे, जयवंत टिबे उपस्थित होते.
राजारामबापू ब्लड बँकेच्या सहकार्याने १०३ रक्तदात्यांनी उत्सफूर्तपणे रक्तदान केले. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ॲड. चिमण डांगे (Annasaheb Dange) यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन रमेश वडे, व्हाइस चेअरमन शाकीदाबी शेख, संचालक प्रकाश बिरजे, सुमंत महाजन, शांतीसागर कांबळे, डॉ. अशोकराव ऐडगे, अमोल चौधरी, प्रकाश गडाळे, शिवाजी जाधव, विनोद देशमुख, राजेंद्र मिरजे, एस. आय. मेत्री, गिरीश पत्की यांनी संयोजन केले. सूतगिरणीचे संचालक प्रकाश बिरजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. संचालक उमेश गावडे यांनी आभार मानले.






