Anjali Damania : अंजली दमानियांचा बीडमध्ये खळबळजनक दावा ; मंत्री संजय शिरसाठ यांचे पुण्यात प्रतिउत्तर

पुणे: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा मृतदेह कर्नाटकच्या बॅाण्ड्रीवर सापडल्याचा निनावी फोन आला असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या विषयीची माहिती बीडच्या पोलीस अधिकक्षकांना दिली असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रेत सांगितले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून बीडमध्ये आज दि. २८ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या प्रकणाता अॅड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोपी केले असून सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी त्यांनी केलेल्या आरोप बोगस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शिरसाठ यावेळी बोलतना म्हणाले, तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या, हत्या झाली तर त्यांचे मृतदेह कुठ आहेत सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळ बिघडत असल्याची प्रतिक्रिया शिरसाठ यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच ते म्हणाले अंजली दमानिया या बोगस आरोप करीत असतात. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल. ६ एजन्सी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचाही गय केली जाणार नसल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.
अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
काल रात्री मला साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना एक निनावी फोन आला होता. व्हॉट्सअप कॉलवर या सांगितलं. फोन लागला नाही. त्यांनी मला व्हॉइस मेल पाठवले. त्याने सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लोक कधीच भेटणार नाहीत. ते मेले. तीन प्रेते सापडली. ती जागाही कॉल केलेल्यांने सांगितली. हे खरं खोटं मला माहीती नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचे मर्डर झाले आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी बीडमध्ये दिली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.





