नवी दिल्ली – मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत बुडून वाहक आणि चालक यांच्यासह 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तर या दुर्घटनेत जखमी झाल्यानं 50,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल, असेही सांगितले आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the bus tragedy in Dhar, Madhya Pradesh. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2022
पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.