‘भारताने शॉक देण्याऐवजी शत्रूच्या गळ्यात लांब दोरी बांधलीय…’, अमरुल्लाह सालेहंची पहलगामवरील प्रतिक्रिया चर्चेत

Amrullah Saleh । पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.
अमरुल्लाह सालेह यांनी पहलगाम हल्ल्याविषयी बोलताना, “असे दिसते की भारताने आपल्या शत्रूंना शिक्षा करण्यासाठी इलेक्ट्रिक चेअर वापरण्याऐवजी त्यांच्या गळ्यात एक लांब दोरी बांधली आहे. याचा असा अर्थ आहे की भारत आपल्या शत्रूंना एकाच वेळी संपवण्याऐवजी त्यांच्यावर पूर्णपणे पकड घट्ट करून त्यांना हळूहळू शिक्षा करत आहे.’ असे त्यांनी म्हटले.
हल्ल्यानंतर भारताचे कठोर पाऊल Amrullah Saleh ।
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १६ जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे. भारत दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दहशतवादाविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, पाकिस्तान हाय अलर्ट मोडवर आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (CCS) सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला. भारताने पहिल्यांदाच इतकी मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन मोठी युद्धे झाली आहेत परंतु हा करार यापूर्वी कधीही स्थगित करण्यात आला नव्हता.
कॅबिनेट समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत, परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते ज्यामध्ये म्हटले होते की १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहील.
अमरुल्लाह सालेह कोण आहे? Amrullah Saleh ।
ऑक्टोबर १९७२ मध्ये पंजशीर प्रांतात जन्मलेले अमरुल्लाह ताजिक वांशिक गटातील कुटुंबातील आहेत. लहान वयातच त्यांनी त्यांचे कुटुंब गमावले. अशा परिस्थितीत, तरुण वयातच तो अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखालील तालिबान विरोधी चळवळीत सामील झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरुल्लाह सालेह यांना तालिबानकडून वैयक्तिकरित्या नुकसान पोहोचले आहे. १९९६ मध्ये तालिबानने त्याच्या बहिणीवर अत्याचार करून तिची हत्या केली. सालेह म्हणतात की तेव्हापासून तालिबानबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. अशा परिस्थितीत त्यांनी तालिबानचा पराभव करण्याच्या लढाईत भाग घेतला. १९९७ मध्ये, अमरुल्लाह सालेह यांची मसूद यांनी संयुक्त आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयात नियुक्ती केली. जे दुशान्बे, ताजिकिस्तान येथे होते. तिथे त्याने परदेशी गुप्तचर यंत्रणेसोबत जवळून काम केले.
हेही वाचा
डोनाल्ड ट्रम्पकडून आता सिनेसृष्टीवर करसंकट ; विदेशी चित्रपटांवर लादला १००% कर





