Amitabh Bachchan: ‘ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे साप’… गैरवर्तनाच्या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा जीवनधडा

Amitabh Bachchan: ‘कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर्स वीक’ मध्ये 10 वर्षांचा स्पर्धक इशित भट्टच्या वागणुकीनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. या वादानंतर अमिताभ बच्चन यांनी थेट नाव न घेता ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ या विषयावर भाष्य करत सर्वांना एक महत्त्वाचा जीवनधडा दिला. त्यांनी सांगितले की, “ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे साप आहे, जो क्षणात सगळं खाली आणू शकतो.”
काय घडलं होतं ‘केबीसी 17 ज्युनियर्स’मध्ये?
गुजरातच्या गांधीनगरमधील 10 वर्षांचा इशित भट्ट या स्पर्धकाने शो दरम्यान अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि काहीअंशी उद्धट वर्तन केलं. अमिताभ बच्चन प्रश्न विचारत असताना इशितने त्यांना मध्येच थांबवत म्हटलं, “नियम सांगायला नका बसू.” त्याने प्रश्नाचे पर्याय नीट न ऐकता थेट उत्तर लॉक करण्यास सांगितले. पण ‘रामायण’वरील प्रश्नाचे उत्तर चुकीचे निघाल्याने तो जिंकलेली रक्कम गमावून बसला. त्याच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका झाली आणि मोठा वाद निर्माण झाला.
अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया
या घटनेनंतरच्या भागात महाराष्ट्रातील नागपूरची स्पर्धक स्पृहा तुषार शिंखेड़े हॉटसीटवर होती. तिच्यासोबत खेळ सुरू करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ओव्हर कॉन्फिडन्स आणि पराभव या विषयावर बोलताना सर्वांना सावध केले.
त्यांनी “खरगोश आणि कासवाची गोष्ट” उदाहरण म्हणून सांगितली.
“कासवाचा विजय शक्यच नव्हता, पण सशाचा अति आत्मविश्वास त्याला हरवून बसवतो. म्हणून जोखीम घेताना सावध रहा आणि आत्मविश्वास ठेवा, पण तो अहंकारात बदलू देऊ नका.”
त्यांनी पुढे सांगितले की, खेळ असो वा आयुष्य स्थिर मनाने आणि संयमाने चालणारा माणूसच शेवटी जिंकतो.
ही अमिताभ बच्चन यांची अप्रत्यक्ष पण थेट शिकवण इशित भट्टच्या वादाशी जोडली जात आहे. त्यांच्या या शब्दांमधून एक स्पष्ट संदेश मिळतो की,
अति आत्मविश्वास कधीही माणसाला खाली खेचू शकतो, म्हणून नम्रता आणि संयम हेच यशाचे खरे रहस्य आहे.





