Amitabh Bachchan: ऐश्वर्या रायच्या अपघातानंतर दोन दिवस झोपले नव्हते अमिताभ बच्चन; ‘तो’ प्रसंग आजही आठवतो
Amitabh Bachchan: चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान स्टंट किंवा अॅक्शन सीन करताना कलाकारांना दुखापत होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. असाच एक धक्कादायक प्रसंग २००३ साली अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत घडला होता.

Amitabh Bachchan: चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान स्टंट किंवा अॅक्शन सीन करताना कलाकारांना दुखापत होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. असाच एक धक्कादायक प्रसंग २००३ साली अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत घडला होता.
‘खाकी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या या अपघातानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वतः तिच्या मदतीसाठी धावून गेले होते, इतकंच नव्हे तर या घटनेमुळे त्यांना दोन दिवस झोपही आली नव्हती, असा खुलासा बिग बींनी एका मुलाखतीत केला होता.
नाशिकमध्ये शूटिंगदरम्यान घडलेला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूर ‘खाकी’ चित्रपटाचं शूटिंग नाशिकमध्ये करत होते. यावेळी एका स्टंट सीनदरम्यान एका स्टंटमनचा तोल गेला आणि त्याची गाडी थेट ऐश्वर्या ज्या खुर्चीवर बसलेली होती तिथे जाऊन धडकली. या अपघातात ऐश्वर्याला पाठीत आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्या वेळी अनेकांना हा किरकोळ अपघात वाटत होता, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती खूप गंभीर होती.

Aishwarya Rai
अमिताभ बच्चन स्वतः मदतीसाठी पुढे
या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतः पुढाकार घेत ऐश्वर्याच्या उपचारांची जबाबदारी घेतली. एका मुलाखतीत बिग बींनी सांगितलं होतं, “मी ऐश्वर्याच्या आईला विचारलं की त्यांना मुलीला तात्काळ मुंबईला न्यायचं आहे का. त्यासाठी आम्ही अनिल अंबानी यांच्या खासगी विमानाची व्यवस्था केली होती. यासाठी दिल्लीतून विशेष परवानगी घ्यावी लागली. विमानातील सर्व सीट्स काढण्यात आल्या होत्या. तरीही लोकांना हा छोटासा अपघात वाटत होता.”
“दोन दिवस झोप आली नाही…”
या घटनेचा मानसिक ताण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्यावर किती खोलवर होता, हे सांगताना ते पुढे म्हणाले, “हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं होतं. त्यामुळे मला सलग दोन दिवस झोप आली नाही. तिच्या जखमा खूप गंभीर होत्या.”
त्या वेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न झालेलं नव्हतं. काही वर्षांनंतर, २००७ मध्ये या दोघांनी पारंपरिक पद्धतीने विवाह केला. आज त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे.

Amitabh Bachchan
माणुसकीचं नातं अधोरेखित करणारा प्रसंग
हा प्रसंग केवळ एक अपघात म्हणून नव्हे, तर माणुसकी, काळजी आणि नात्यांची जाणीव करून देणारा ठरला. ऐश्वर्या रायसाठी अमिताभ बच्चन यांनी घेतलेली धावपळ आजही चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून जाते.





