अक्षय कुमार आणि अमृता फडणवीसांची जुहू चौपाटीवर साफसफाई; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mumbai Ganpati Visarjan 2025 | गेली 10 दिवस बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाला अनंत चतुर्दशीदिवशी निरोप देण्यात आला. यावेळी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गणपती विसर्जनानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बीचची स्वच्छता करण्यासाठी आज (7 सप्टेंबर) सकाळी थेट जुहू चौपाटीवर पोहचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस या देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
अक्षय कुमार, अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मिळून जुहू चौपाटीवरील सफाई अभियानात सहभाग नोंदवला. फडणवीस यांची मुलगीही यावेळी उपस्थित होती. विसर्जनानंतर याठिकाणी जमा झालेले निर्माल्य, डेकोरेशनचे साहित्य आणि इतर गोष्टी एकत्र करण्यात आल्या. सोशल मीडियावर या अभियानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार म्हणाला की, “स्वच्छता ही केवळ सरकारची किंवा BMC जबाबदारी नाही, तर सर्व जनतेचीही जबाबदारी आहे.” अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गणपती विसर्जनाच्या उत्सवानंतर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड प्रदूषण पाहायला मिळते. त्यामुळे वेगवेगळ्या बीचवर स्वच्छता मोहीम राबवली जाते.
अमृता आणि अक्षय यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. तर काही प्रमाणात त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. ‘छान ड्रामा चालला आहे’, ‘कॅमेरा बंद सफाई बंद’, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. Mumbai Ganpati Visarjan 2025 |
अक्षय कुमारच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, 19 सप्टेंबरला अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा ‘जॉली एलएलबी 3’ रिलीज होणार आहे. याशिवाय तो ‘भूत बंगला’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘हैवान’ आणि ‘हेरा फेरी 3’ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Mumbai Ganpati Visarjan 2025 |
हेही वाचा :
ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका





