Ajit Pawar : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण अपघात झाला. मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या लिअरजेट ४५ या विमानाने लँडिंगच्या वेळी धावपट्टीपासून बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानातील पाच जणांचा (दोन पायलट, फ्लाइट अटेंडंट आणि त्यांचा व्यक्तिगत सुरक्षा रक्षक) मृत्यू झाला. अपघातानंतर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अपघातामागे घातपाताचा आरोप करत चौकशीची मागणी केली. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली. शरद पवार काय म्हणाले? शरद पवार म्हणाले, “मी स्वतः अभ्यास केला आणि इतर लोकांची मतंही ऐकली. पण माझ्याकडे कोणतीही ऑथेंटिक माहिती नाही जी घातपात दर्शवते. अपघाताच्या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान एअरपोर्टवर पोहोचले. लँडिंग होत असताना विमान धावपट्टीपासून बाजूला गेले आणि अपघात झाला.” Ajit Pawar plane crash ते पुढे म्हणाले, “अपघातानंतर मी मुंबईहून हेलिकॉप्टरने बारामतीला निघालो. हेलिकॉप्टरमध्ये मला अपघाताची माहिती मिळाली. बारामतीला लँडिंग केल्यानंतर मी सर्व परिस्थिती पाहिली. प्राथमिकदृष्ट्या मला हा अपघात वाटला. रोहित आणि त्यांच्या लोकांनी अभ्यास केल्यानंतर त्यांची वेगळी मतं आहेत, पण त्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही.” अशोक खरात प्रकरणावरही प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अशोक खरात प्रकरणावरही बोलताना आपली पारदर्शकता अधोरेखित केली. ते म्हणाले, “तुम्ही मला किती वर्षांपासून ओळखता? माझ्या हातात कधी गंडा दिसला? मी दोन-तीन ठिकाणी जातो – पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचे दर्शन घेतो, तुळजापूरला गेलो तर तुळजा भवानीचे दर्शन घेतो. महत्त्वाचे काम असेल तर कन्हेरी (माझे गाव) येथील महादेव मंदिरात जातो – दोन-चार वर्षांतून एकदा. जे करतो ते जाहिरात करत नाही. आज महाराष्ट्रात चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले आहे.” शरद पवार यांच्या या विधानाने अपघातामागील घातपाताच्या (Ajit Pawar) अफवांना थोडा ब्रेक लागला असला तरी, रोहित पवार आणि इतर काही नेत्यांकडून चौकशीची मागणी सुरूच आहे. अपघाताची अधिकृत चौकशी DGCA आणि इतर यंत्रणांकडून सुरू आहे.