Aishwarya Rai । ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. या जोडप्याच्या विभक्त झाल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहे. पण दोघांनीही यावर मौन पाळले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक आता कोणत्याही आऊटिंग किंवा फंक्शनमध्ये एकत्र दिसत नाहीत. इतकंच नाही तर आता दोघेही एकत्र फोटो शेअर करत नाहीत ज्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली. जेव्हा अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले तेव्हा त्याने तिला खरी नसून बनावट अंगठी दिली होती. न्यूयॉर्कमध्ये गुरु चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. जेव्हा अभिषेक न्यूयॉर्कमध्ये दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करत होता तेव्हा तो त्याच्या हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून विचार करत होता की त्याचे आणि ऐश्वर्याचे लग्न झाले तर किती चांगले होईल. बनावट अंगठी देऊन प्रपोज केले गुरूच्या प्रीमियरनंतर अभिषेकने ऐश्वर्याला त्या हॉटेलच्या बाल्कनीत नेले आणि तिला प्रपोज केले. तेव्हा ऐश्वर्याने त्याला हो म्हटलं. ऐश्वर्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, अभिषेकने तिला बनावट अंगठी देऊन प्रपोज केले होते. अभिषेकने तिला गुरूच्या शूटिंगवेळी जी अंगठी घातली होती तीच अंगठी घालून तिला प्रपोज केले होते. ही अंगठी बनावट असूनही ऐश्वर्याने त्याला हो म्हटलं होतं. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले होते. या जोडप्याच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे. आराध्याला नेहमी तिच्या आईसोबत स्पॉट केले जाते.