Ranveer Singh : बॅालिवूड अभिनेता रणवीर सिंग याने ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या सिनेमात केलेल्या कामामुळे त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. या दोन्ही सिनेमांच्या प्रचंड यशानंतर आता तो नव्या आणि अधिक भयानक अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी काळात तो अनेक सिनेमांमध्ये दिसणार असला तरी, ‘प्रलय’हा सिनेमा रणवीरच्या आतापर्यंतच्या प्रोजेक्ट्सपैकी सर्वात वेगळा आणि मोठा मानला जात आहे. सुरुवातीला या सिनेमाची कथा पोर्तुगीज कादंबरी ‘ब्लाइंडनेस’वर आधारित असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते हंसल मेहता यांनी या अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले की, ‘प्रलय’ ही पूर्णपणे मूळ कथा आहे. ही कथा जय मेहता आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. हंसल मेहता यांनी सांगितले की, जय मेहता या कल्पनेवर बऱ्याच काळापासून काम करत होता. रणवीर सिंगला ही संकल्पना खूप आवडल्याने त्याने स्वतः पुढाकार घेत या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आणि सिनेमाच्या विश्वनिर्मितीतही सक्रिय सहभाग घेतला. या सिनेमात रणवीरसोबत साऊथ सिनेमा इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘लोकाह’ सिनेमाच्या यशानंतर ती सध्या चर्चेत आहे. ‘प्रलय’चे दिग्दर्शन जय मेहता करत असून, त्याने यापूर्वी ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ या गाजलेल्या वेबसिरीजचे सह-दिग्दर्शन केले आहे. या वेबसिरीजची निर्मिती ‘ट्रू स्टोरी फिल्म्स’ आणि रणवीर सिंगच्या ‘मा कसम फिल्म्स’या बॅनरखाली होत आहे. प्रलय सिनेमाचे अंदाजित 300 कोटी रुपयांचे बजेट असून चित्रीकरणाला 2026 च्या मध्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. तर सिनेमा 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘प्रलय’ सिनेमाची कथा झोम्बी आधारित डिस्टोपियन थ्रिलर असून, झोम्बींनी ग्रासलेल्या शहरात मानवांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्ष दाखवला जाणार आहे. त्यामुळे रणवीर सिंगचा हा ‘प्रलय’ अवतार प्रेक्षकांसाठी थरारक अनुभव ठरणार आहे. आता चाहते त्याला नवीन अवतारात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हेही वाचा : Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांना MVA तील त्या बड्या नेत्याचा पाठिंबा; सुनील तटकरेंनी दिली माहिती