‘… म्हणून मी माझे अकाउंट सुरू केले’, सोशल मीडिया वापराबाबत अभिनेत्री मयुरी देशमुखने व्यक्त केले मत, म्हणाली…

Actress Mayuri Deshmukh: आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर न करणारी व्यक्ती क्वचितच सापडते. अनेकजण दिवसभर सोशल मीडियावर तासंतास घालवतात. कलाकारांकडूनही त्यांच्या कामाबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा सोशल मीडियावर कलाकारांच्या कामाचे कौतुक होते. तसेच, काहीवेळा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आता यावर अभिनेत्री मयुरी देशमुख हिने भाष्य केले आहे.
वैयक्तिकरित्या मी सोशल मीडियाची फार मोठी चाहती नाही. कारण कुठे तरी आपण सगळेच तिथे आपलं जे उत्तम असते, केवळ तेवढेच शेअर करतो, असे मत मयुरी देशमुखने व्यक्त केले. ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मयुरी विविध मुद्यांवर व्यक्त झाली. यावेळी बोलताना मयुरी सोशल मीडियाच्या वापराबाबतही व्यक्त झाली.
मुलाखतीमध्ये बोलताना मयुरी म्हणाली की, मी प्रामाणिकपणे सांगते सोशल मीडिया मला महत्त्वाचं वाटत नाही. मी या फील्डमध्ये नसते तर किंबहुना माझे सोशल मीडिया अकाउंट देखील नसते.
‘खुलता कळी खुलेना’नंतर माझ्या नावाने 5-6 फेक अकाउंट्स तयार झाले होते. त्यावेळी सहकलाकार म्हणाले की, तुला कधी स्वत:चे म्हणणे मांडायचे असेल, तर तुझ्याकडे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हवा. त्यामुळे मी अकाउंट सुरू केले.’
वैयक्तिकरित्या सोशल मीडियाची फार मोठी चाहती नाही. इथे आपण सगळेच आपले जे उत्तम असते, ते शेअर करतो. पण मी माझे हळवे क्षण किती वेळा तुमच्यासमोर आणते? एखादा कमकुवत मनाचा व्यक्ती तुमचे अकाउंट फॉलो करत असेल, तर त्याला वाटू शकते की हिचे आयुष्य फारच भारी आहे, माझे का नाहीये आणि ते चुकीचं आहे, असे मत देखील मयुरीने व्यक्त केले.
या मुलाखतीमध्ये बोलताना मयुरीने वैयक्तिक आयुष्यावर देखील भाष्य केले. 2020 मध्ये तिचा आशुतोष भाकरेने आत्महत्या केली होती. यातून ती कशी बाहेर पडली याबाबत बोलताना मयुरी म्हणाली की, ‘मुळात मी एकटीने सगळं हँडल केलं असं नाही. अनेकांनी मला मदत केली. तसंच मी कायम सकारात्मक राहते हा माझा दृष्टिकोन असतोच. देवाला माहित असतं की आपल्यात किती क्षमता आहे. आपण कुठल्या प्रसंगातून बाहेर पडू.’
मयुरीच्या कामाबद्दल सांगायचे तर ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. तिने ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतही काम केले. तसेच, ‘इमली’ या हिंदी मालिकेतही भूमिका साकारली होती.





