जगात दर महिन्याला घडतेयं एक भयंकर घटना; शास्त्रज्ञांना वाटतेय जगाच्या अंताची भीती

वॉशिंग्टन – जगात दर महिन्याला एक अशी भयंकर घटना घडते आहे, ज्यामुळे पृथ्वीचा अंत जवळ आला की काय, अशी भीती वाटू लागली आहे. एका नवीन अहवालात समोर आलं आहे की, गेल्या 12 महिन्यांत प्रत्येक महिन्याने मागील महिन्यातील तापमानाचा विक्रम मोडला आहे. दर महिन्याला तापमान 1.5 अंश सेल्सिअसनं वाढत आहे.
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार, जून 2023 पासूनचा प्रत्येक महिना मागील महिन्याच्या तुलनेत अधिक उष्ण राहिला आहे, ज्यामुळे जुलै 2023 ते जून 2024 दरम्यान जगाचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा 1.64 अंश सेल्सिअस जास्त आहे.
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसचे संचालक कार्लो बुओनटेम्पो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे आकडेवारीपेक्षा अधिक गंभीर आहे आणि ते आपल्या हवामानात मोठ्या प्रमाणात आणि सतत होत असलेल्या बदलांवर प्रकाश टाकते. जरी हा ट्रेंड एका टप्प्यावर थांबला तरी, जसजसं हवामान गरम होत जाईल तसतसं आपण नवीन विक्रम मोडताना पाहू.
जोपर्यंत आपण वातावरण आणि महासागरांमध्ये हरितगृह वायूंचा प्रसार थांबवत नाही, तोपर्यंत सतत वाढत जाणारे तापमान टाळता येणार नाही. गेल्या 12 महिन्यात दर महिन्याला तापमान वाढण्याचं एक कारण म्हणजे एल निनो. ज्यामध्ये उष्णकटिबंधीय पूर्व पॅसिफिक प्रदेशातील पाणी सामान्यपेक्षा जास्त उष्ण होतं. ही परिस्थिती जून 2023 ते मे 2024 पर्यंत होती. त्यामुळे पूर्व आणि मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा जास्त झाले.
शास्त्रज्ञांना सुरुवातीला आशा होती की, एल निनोच्या समाप्तीमुळे पृथ्वीला दिलासा मिळेल, परंतु नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननुसार, उर्वरित उन्हाळ्यात यूएसमध्ये अजूनही सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, विक्रमी-उच्च तापमान कधीही कमी होण्याची शक्यता नाही.
आपण आधीच आपत्तीजनक हवामान बदलाचे परिणाम पाहत आहोत, ज्यामध्ये अति उष्ण आणि थंड हवामानातील घटनांमध्ये वाढ, बर्फाच्या आवरणांमध्ये होणारी धोकादायक घट, समुद्रातील बर्फ आणि हिमनदी आणि मोठ्या प्रमाणात कोरल ब्लीचिंग घटनांचा समावेश आहे, ज्यामुळे लोक, अर्थव्यवस्था आणि निसर्ग यांना धोका आहे. प्रचंड नुकसान होत आहे.
1.5 अंश सेल्सिअस हा एक महत्त्वाचा इशारा आहे. 1.5 अंश सेल्सिअस तापमान वाढीमुळे जगातील हवामान मोठ्या बदलातून जात असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी 2018 च्या विशेष अहवालात दिला आहे. तापमानात ही वाढ होत राहिल्यास पृथ्वी कमालीची उष्ण होईल. यामुळे उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि परिसंस्थांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल. उच्च तापमान महासागरांना उबदार करेल, परिणामी तीव्र वादळांच्या संख्येत वाढ होईल आणि ते किनाऱ्याजवळ येताच ते अधिक शक्तिशाली बनतील.
जंगलातील आग देखील अधिक तीव्र होईल आणि जास्त काळ टिकेल. समुद्रातील बर्फ वितळण्यास वेग येईल, ज्यामुळे समुद्र पातळी वाढेल. 1.5 अंश सेल्सिअस तापमानात वाढ होत राहिल्यास जग संपेल का? हवामान शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे अनेक गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, परंतु त्या धोक्यांमध्ये मानव नष्ट होणं समाविष्ट नाही.





