Abhijit Dipke : सीजेपीकडून मोठा इशारा, आणखी एक राजीनामा? नेमकं असं घडलं तरी काय?
Abhijit Dipke : वाढता विरोध आणि निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने अखेर विद्यार्थ्यांची चौकशी तसेच त्यांच्या वकिली नोंदणीला रोखण्यासंदर्भातील आदेश मागे घेतला आहे.

Abhijit Dipke : NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या दीक्षांत समारंभासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना निमंत्रित केल्याने निर्माण झालेला वाद आता आणखी चिघळला आहे. या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चौकशीची कारवाई करण्यासोबतच त्यांना वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याचा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतला होता. या निर्णयामुळे कायदेवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांना वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याच्या निर्णयाला कॉकरोच जनता पार्टीने तीव्र विरोध केला. तसेच या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. वाढता विरोध आणि निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने अखेर विद्यार्थ्यांची चौकशी तसेच त्यांच्या वकिली नोंदणीला रोखण्यासंदर्भातील आदेश मागे घेतला आहे.
या निर्णयामुळे NALSAR विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर बार कौन्सिलने घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता सीजेपीने बीसीआयचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची केली आहे. निर्णय मागे घेण्याबाबत मनन मिश्रा यांनी एक्सवर दिलेल्या माहितीवर उत्तर देताना सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला. “मित्रांनो हे साध्य झाले आहे… तरुणांसाठी आणखी एक मोठा विजय… पण लढा मात्र सुरूच राहील…” असे म्हटले आहे.
या प्रकरणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची वेळ आली आहे का? यावर कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते साैरभ दास यांनी म्हटले की, मनन कुमार मिश्रा यांच्याबद्दल काही गोष्टी पुढे येत आहेत, त्या नक्कीच चिंताजनक आहेत. त्यांचा लगेचच राजीनामा झाला पाहिजे. व्यवस्थित चालणाऱ्या लोकशाहीत असेच घडते. त्यामुळे मनन कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
कोण आहेत मनन कुमार मिश्रा?
- मनन कुमार मिश्रा हे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते एक ज्येष्ठ वकील आहेत. ते सध्या बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
- त्यांनी १९७७-१९८० मध्ये पाटणा विद्यापीठाच्या पाटणा लॉ कॉलेजमधून बॅचलर ऑफ लॉज (एलएल.बी.) आणि १९७३-१९७६ मध्ये बिहार विद्यापीठाच्या छपरा येथील राजेंद्र कॉलेजमधून बी.एस्सी. (ऑनर्स) पदवी प्राप्त केली.
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोपालगंज दिवाणी न्यायालयात वकिली सुरू केली. त्यांनी १९८२ मध्ये पाटणा उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून वकिली सुरू केली. त्यांनी दीर्घकाळ बीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम केले. २०२५ मध्ये ते सलग सातव्यांदा निवडून आले.
- मनन कुमार मिश्रा हे राजकारणात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. २०१० मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले.
- २०२४ मध्ये भाजपने त्यांना बिहारमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले आणि त्यानंतर ते बिनविरोध निवडून आले. ते एक ज्येष्ठ वकील आणि राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
Chamoli Tunnel Accident: चमोली बोगद्यातील दुर्घटनेत ७ कामगारांचा मृत्यू ; मृत आणि जखमींची नावे समोर




