Mahakumbh Stampede | उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापूर्वी देखील अशा दुर्घटना घडल्या आहेत. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 1954 प्रयागराज कुंभ मेळा: प्रयागराजमध्ये 1954 च्या कुंभ हे मेळाव्यात चेंगरामध्ये 800 हून अधिक लोक ठार झाले आणि 2000 हून अधिक लोक जखमी झाले. 3 फेब्रुवारी 1954 ला ही घटना मौनी अमावास्याच्या अंतिम शाही स्नानच्या वेळी घडली. त्यावर्षी या कुंभमेळयात 4-5 दशलक्ष भाविकांनी हजेरी लावली होती. 2003 नाशिक कुंभ: 27 ऑगस्ट 2003 च्या नशिक सिंहस्थ कुंभ येथे अंतिम शाही स्नान दरम्यान एका अपघातात 39 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. हा अपघात काही संतांद्वारे चांदीच्या नाण्यांच्या लुटण्यामुळे झाला होते. ज्यात भाविक नाणे लुटण्यासाठी भक्तांनी एकच गोंधळ निर्माण केला होता. यात स्त्रिया, मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी चेंगराचेंगरीमध्ये आपला जीव गमावला. हरिद्वार का कुंभ : 1986 च्या हरिद्वार महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सुमारे 200 लोक ठार झाले. 14 एप्रिल 1986 उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार स्नान करण्यासाठी आले होते. त्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. हरिद्वार 2010 : 14 एप्रिल 2010 रोजी हरिद्वार येथे कुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. हरिद्वार कुंभमध्ये शाही स्नान दरम्यान साधू आणि भक्त यांच्यात झालेल्या चकमकीनंतर 7 लोक मारले गेले आणि 15 जण जखमी झाले होते. प्रयागराज 2013 : हा अपघात अलाहाबाद रेल्वे स्थानकात झाला. या अपघातात 42 लोकांचा मृत्यू झाला. अहवालानुसार अलाहाबाद रेल्वे स्थानकातील फूटब्रिजवर रेलिंग पडल्यानंतर एक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 29 महिला, 12 पुरुष आणि आठ वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत 45 लोक जखमी झाले होते. उज्जैन 1992: उज्जैन मध्ये सिंहस्थ कुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा तिथेही चेंगराचेंगरी झाली होती. त्या अपघातात 50 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला होता. हेही वाचा: “मला गोळी लागलीय, मी मरतोय” हे त्यांचे होते शेवटचे वाक्य” ; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा