A P Aboobacker Musliya : “महिलांनी घरातच बंदिस्त राहावे” ; मुस्लिम धर्मगुरूंच्या विधानावर काँग्रेसचा आक्षेप
A P Aboobacker Musliya : मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी बुधवारी सुन्नी इस्लामी विद्वान कांतपुरम ए. पी. अबूबकर मुसलियार यांच्या, महिलांनी घरातच बंदिस्त राहावे या विधानाला तीव्र विरोध केला.

A P Aboobacker Musliya : मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी बुधवारी सुन्नी इस्लामी विद्वान कांतपुरम ए. पी. अबूबकर मुसलियार यांच्या, महिलांनी घरातच बंदिस्त राहावे या विधानाला तीव्र विरोध केला. सतीशन म्हणाले की, असा विचार केरळच्या पुरोगामी परंपरेला धरून नाही.
तीव्र विरोध (A P Aboobacker Musliya )
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सतीशन म्हणाले, “आम्ही त्या विधानाशी अजिबात सहमत नाही. ते पुरोगामी केरळला धरून नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही.” ते म्हणाले की, महिलांनी फक्त घरातच राहावे असे नाही.
ते म्हणाले, “त्यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सहभागी झाले पाहिजे आणि समाजात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. निःसंशयपणे, हा आमचा पुरोगामी दृष्टिकोन आहे.” सतीशन यांनी राणी बिलकीस यांचे उदाहरण देत सांगितले की, इस्लामी इतिहासात त्यांची शासक म्हणून नोंद आहे.
ते म्हणाले, “इस्लामिक इतिहासात अशा महिलांची उदाहरणे आहेत ज्या व्यावसायिक होत्या, ज्यांनी लष्करी नेतृत्वाची भूमिका बजावली आणि ज्या राण्या होत्या.” ही सर्व उदाहरणे इस्लामी इतिहासात अस्तित्वात आहेत. (A P Aboobacker Musliya)
मुख्यमंत्र्यांनी खलिफतीच्या काळातील एका घटनेचाही उल्लेख केला, जेव्हा एका महिलेने मेहर (विवाहाच्या वेळी पतीने पत्नीला द्यायची रक्कम) बाबतच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ते म्हणाले की, तत्कालीन शासकाने त्या महिलेचा युक्तिवाद योग्य असल्याचे मान्य केले होते. सतीसन म्हणाले, “या उदाहरणांवरून हे दिसून येते की राजदरबारातही महिलांना स्थान होते. त्यामुळे, आम्ही अशा विचारांशी कोणत्याही प्रकारे सहमत होऊ शकत नाही.”
प्रकरण काय आहे? (A P Aboobacker Musliya )
सुन्नी इस्लामिक विद्वान कंथापुरम ए. पी. अबुबकर मुसलियार यांनी रविवारी कोची याठिकाणी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, महिलांनी आपल्या घरातच राहिले पाहिजे. महिलांचे सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दिसणे समाजासाठी हानिकारक आहे. म्हणूनच इस्लाममध्ये पडदा आणि घरातच राहण्याची प्रथा आहे.”
त्यांनी दावा केला की, संघटनेचे विद्वान गेल्या १०० वर्षांपासून हीच शिकवण देत आहेत आणि या परंपरेने महिलांचा आदर टिकवून ठेवला आहे. कंथापुरम यांनी स्पष्ट केले की, कोणतीही संघटना किंवा नेता याला विरोध करो, ते धर्माच्या नियमांनुसार आपली मते व्यक्त करत राहतील आणि त्यांना कोणीही थांबवू शकत नाही.




