महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नांदी! उद्धव ठाकरेंनी संदेश नाहीतर थेट बातमीच दिली! भरमेळाव्यातून युतीची केली घोषणा

Uddhav Thackeray ; वरळीतील डोम सभागृहात तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मराठी भाषेच्या मुद्यावर दोघेही एकत्र आले होते. दोघांचीही व्यासपीठावर दमदार एन्ट्री झाली. यावेळी टाळ्या शिट्या अन् जल्लोष असे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपली ठाम मराठी भाषेसंदर्भात ठाम भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूच्या एकत्रित येणे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषेद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चांवर संदेश नाही तर थेट बातमीच देतो असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानानाची आठवण उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यातील भाषणामुळे झाली आहे.
ठाकरे बंधूंनी मराठी भाषेच्या मुद्यावर केंंद्रस्थानी ठेऊन राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले. आमच्या अंतर्पाठ अनाजी पंतांनी दूर केला, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नांदी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले उद्धठ ठाकरे?
आमच्या अंतर्पाठ अनाजी पंतांनी दूर केला, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. शिवसेनेचा वापर करुन घेतला, पण आता आम्ही दोघे एकत्र आलोय, सर्वांना फेकून देणार. त्यांच्या या विधानामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण पाहायला मिळणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे विधान महत्वाचे मानले जात आहे. आगामी काळात ठाकरे बंधूंची ही एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरू शकते. .
अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं : राज ठाकरे
आज मोर्चा निघायालाच पाहिजे होता. मोर्चामध्ये मराठीच्या एकतेचं चित्र दिसले असते. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपीठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असे विधान राज ठाकरेंनी केले.
हेही वाचा : टाळ्या शिट्या अन् जल्लोष….! ‘ठाकरे बंधूं’ची ग्रॅन्ड एन्ट्री! राज ठाकरेंच्या लूकमध्ये राजकीय संदेश?





