“इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे आणि भारतीय साम्राज्यावर…”; आर माधवनच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

Actor R Madhavan | अभिनेता आर माधवनने एका मुलाखतीत शालेय अभ्यासक्रमातील भारतीय इतिहासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. देशाच्या भूतकाळातील महत्त्वाचे भाग, विशेषत: दक्षिणी राज्यांच्या उपलब्धींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. शालेय शिक्षणात मुघलांवर 8 धडे आणि वैभवशाली चोळ साम्राज्यावर केवळ एक धडा का? असा प्रश्न आर माधवन याने प्रश्न उपस्थित केला आहे.
एका मुलाखतीत आर माधवन शालेय इतिहासाच्या पुस्तकांबद्दल म्हणाला, “माझं वक्तव्य कदाचित त्रासदायक ठरु शकतं, पण तरी मी बोलेल. जेव्हा मी पुस्तकांमधील इतिहास वाचला. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे तर हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतींवर दोन धडे होते. ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्यलढ्यावर 4 धडे आणि दक्षिणेकडील राज्यांवर चोळ, पांड्य, पल्लव यांच्यावर फक्त एक धडा आहे.”
माधवन याने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये चोळ साम्राज्याकडे कमी लक्ष दिल्याबद्दल निराशा व्यक्त केली. मुघल आणि इंग्रजांनी आपल्या देशावर जवळपास 800 वर्ष राज्य केलं असले. तर चोळ साम्राज्याला 2,400 वर्षांचा इतिहास आहे. समुद्र सफर आणि नाविक दलाचा पाया चोळ साम्राज्यात घालण्यात आला. चोळ साम्राज्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभाव संपूर्ण कोरियामध्ये पसरला आहे, तरीही हा समृद्ध इतिहास फक्त एका धड्यापुरता मर्यादित आहे. असा अभ्यासक्रम कोणी ठरवला? तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे, पण त्याबद्दल कोणालाही माहिती नाही. आपल्या संस्कृतीत लपलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची आता थट्टा केली जात असल्याचे म्हणत आर माधवनने नाराजी व्यक्त केली आहे.
एनसीईआरटी बद्दल काय वाद आहे?
माधवनने इतिहासावर विधान अशा वेळी केलं आहे जेव्हा एनसीईआरटीने इयत्ता 7 वी च्या इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांऐवजी भूगोल, महाकुंभ उत्सव आणि मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांवरील धडे देण्यात आले आहेत. या निर्णयाचं अनेकांना समर्थन केलं आहे तर, अनेकांनी यावर टीका केली आहे.
दरम्यान, आर. माधवन अलीककडेच रिलीज झालेल्या ‘केसरी 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्याने वकिलाची भूमिका साकारली आहे. त्याच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट 1919 च्या जलियांवाला बाग हत्याकांडानंतर न्याय मिळवण्यासाठी नायर यांच्या संघर्षाच्या कथेवर आधारित आहे.
हेही वाचा:
राज्याच्या इतिहासात पहिल्यादांच चौंडीत होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मोठा निर्णय होणार?





