valvi movie । 70th National Film Awards Announcement : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक मानला जातो. हा पुरस्कार 2022 मध्ये प्रदर्शित चित्रपटांसाठी असल्याने यंदाच्या पुरस्कारांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देशभरातील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि इतर तांत्रिक श्रेणींसह विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन केले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंना प्रोत्साहन आणि सन्मान देण्याचे हे पुरस्कार महत्त्वाचे माध्यम आहे. यामध्ये ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वारसा’ या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘वाळवी’ चित्रपटाची कथा ‘वाळवी’मध्ये अनिता दाते आणि स्वप्नील जोशी या जोडप्याची ही गोष्ट आहे. या दोघांचं नाते आता पूर्वीसारखे राहिले नाही. अनिकेतचं देविकाशी (शिवानी सुर्वे) सूत जुळलं आहे. त्यामुळे अवनीला वैतागलेला अनिकेत हा तिला घटस्फोट मागत आहे. मात्र, ती घटस्फोट देण्यासाठी तयार नाही. अवनी आणि अनिकेत कर्जबाजारी झाल्याने जगाला कंटाळून दोघेही एकत्र आत्महत्या करण्याचा बेत आखतात. सर्व प्लॅनिंग देखील होतं. बंदुका देखील लोड होतात. ठरल्याप्रमाणे सुसाइड नोट देखील तयार होते. अशातच एक-एक नवीन ट्विस्ट येतो आणि चित्र-विचित्र गोष्टी घडू लागतात. या सिनेमाचा शेवट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. आणि त्यामुळेच हा चित्रपट सिनेरसिकांना खूप आवडला आहे. अभिनेता सुबोध भावे म्हणतो, ‘ही माझ्यासाठी आनंदाची भावना..!’ सिनेमाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता सुबोध भावे म्हणाला की, “आपल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची भावना आहे. पण सर्वात जास्त आनंद वाटतोय तो म्हणजे माझ्या दोन्ही मित्रांविषयी. परेश मोकाशी यांनी दिग्दर्शक केलं आहे . बरेच दिवस ते वेगवेगळे चित्रपट देत आहेत. ‘वाळवी’ हा अत्यंत आगळा वेगळा विषय होता. त्यामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचं भाग्य आहे की त्यांनी आम्हाला या चित्रपटात घेतलं. वाळवी चित्रपट करताना देखील आम्ही असाच विचार केला होता की हा चित्रपट चांगला करू जेणेकरून तो प्रेक्षकांना देखील आवडेल. असं अभिनेता म्हणाला आहे. वाचा संपूर्ण यादी: सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा’ या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर विशाल भारद्वाज सर्वोत्तम ठरला फुरसात या लघुपटासाठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मनोज बाजपेयींच्या गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. मल्याळम चित्रपट अट्टमला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा आणि सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. हा सर्वोत्तम दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना ‘उचाई’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार नीना गुप्ता यांना इच्छा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार यावर्षी बॉलिवूडमधील एकाही अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही. नित्या मेनन (थिरुचित्रंभलम) आणि मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ऋषभ शेट्टीच्या कंतारा या चित्रपटाने बाजी मारली आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार ब्रह्मास्त्रसाठी अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार यशच्या KGF 2 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट पुरस्कार मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 1 ने सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय, शोभिता धुलिपाला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मनोज बाजपेयी यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विशेष उल्लेखनिय, गुलमोहर या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.