DA Hike: राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुलै २०२५ पासून हा भत्ता सध्याच्या ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वाढीव भत्त्याचा लाभ जुलै २०२५ पासून लागू होणार असून त्यानुसार थकबाकीही देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हेही वाचा – सेन्सेक्स, निफ्टी सपाट; गुंतवणूकदारांना मात्र 1.68 लाख कोटींचा फायदा