३ महिने, ३ बैठका… ‘ठाकरे ब्रँड’ वाचवण्यासाठी बंधू एकत्र येतील का? BMC निवडणुकीपूर्वी भाकरी फिरणार? वाचा सविस्तर….

Raj Thackeray | Uddhav Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ नुकतंच एका कार्यक्रमानिमित्त एकत्र पाहायला मिळाले. सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचे सध्या सोशल मीडियावर तुफान फोटो व्हायरल होत आहे. यात तिघेही गप्पा, हास्य विनोदात रमल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे ठाकरे बंधूंची ही तीन महिन्यात तिसरी भेट आहे. महायुती आणि महाविकास आघाडी युतीमध्ये फूट पडण्याच्या दावे होत असताना, ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईतील शिवसेना भवनात ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले होते, ज्यामुळे ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अश्या प्रकारच्या अनेक बातम्या समोर येत आहेत.
‘ठाकरें’समोर राजकारण वाचवण्याचे आव्हान….
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर संकट येऊ लागले आहे. एकनाथ शिंदे खऱ्या विरुद्ध बनावट शिवसेनेच्या लढाईत यशस्वी झाले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर त्यांचे राजकारण वाचवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचे राजकारण राजकीय मार्जिनवर उभे असल्याचे दिसून येते. मनसेला त्यांचे खातेही उघडता आले नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पहिल्याच निडवणुकीत पराभवाचा सामना करावाला लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याही राजकारणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्राचे राजकारण बदलले :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने राज्याचे राजकारण बदलून टाकले आहे. राज ठाकरे यांच्या पक्ष मनसेचे खातेही उघडले गेले नाही. एवढेच नाही तर अमित ठाकरे यांचा पहिलाच निवडणूक पराभव झाला आहे. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनाही राजकीय पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या ४० वर्षातील शिवसेनेचा सर्वात मोठा पराभव झाला आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सरकार स्थापन करते. महाराष्ट्रातील सत्तेची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. अशाप्रकारे, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’ वाचवण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत, ठाकरे बंधू एका लग्न समारंभात भेटले असले तरी, त्याचे राजकीय अर्थ शोधले जात आहेत.
सर्वांचे लक्ष बीएमसी निवडणुकीवर :
विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईतील बीएमसी निवडणुकीवर आहे. महाराष्ट्रात सत्ता मिळवल्यानंतर भाजप आता मुंबईत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. बीएमसी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) च्या प्रभावाखाली आहे, जी मुख्यमंत्री फडणवीस केवळ कमकुवत करण्याचाच नव्हे तर आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
म्हणूनच संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना (यूबीटी) महाविकास आघाडीसोबत बीएमसी निवडणूक लढवणार नाही. जर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांसोबत बीएमसी निवडणूक लढवत नसेल, तर ती एकटीच नशीब आजमावेल की त्यांचे भाऊ राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करून निवडणूक रिंगणात उतरेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी सुरू केली. प्रथम पुण्यात आणि नंतर मुंबई भागातील शिवसेना भवनात बॅनर लावण्यात आले, ज्यात दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. हे दोन्ही भाऊ राजकीय मतभेद विसरून एकत्र येतील की नाही हे पाहणे बाकी आहे. जर असं असलं तर महापालिका निवडणुकीत खूपच रंजक चित्र पाहायला मिळणार हे नक्की.
गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा भेट :
15 डिसेंबर 2024 – मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली होती.
22 डिसेंबर 2024 – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न लागले.
23 फेब्रुवारी 2025 – शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे भेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाली.





