Ketan Agrawal death case : 12 तास चौकशी! सियाच्या आई-वडिलांना नेमके कोणते प्रश्न विचारले? महत्त्वाची माहिती समोर
Ketan Agrawal death case : आता तिच्या आई वडीलांची पोलिसांनी तब्बल १२ तास चौकशी केली. या चौकशीत पोलिसांना त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Ketan Agrawal death case : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नुकतीच पोलिसांकडून सियाचा भाऊ साहिल गोयल याची चौकशी करण्यात आली. आता तिच्या आई वडिलांची पोलिसांनी तब्बल १२ तास चौकशी केली. या चौकशीत पोलिसांना त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
प्रवीण गोयल आणि पूजा गोयल २७ जून रोजी सकाळी ११ वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारले असल्याची माहिती समोर आली आहे. सियावर लग्नासाठी दबाव टाकला होता का ? आणि सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेम संबंधाबद्दल माहिती होती का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सियावर लग्नासाठी दबाव नसल्याचा जबाब दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : PCMC Water Cut: आता रात्री गजर लावून जागे राहा! पालिकेच्या ‘या’ निर्णयामुळे नागरिकांची झोप उडाली
पोलिसांनी विचारलेले प्रश्न
- सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?
- सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?
- सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?
- सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
- सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
- लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?
- साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
- लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती? केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध अँगलच्या दृष्टीने तपास केला जात आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावी, अशी मागणी केतनचे वडिल विशाल अग्रवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यानुसार हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोणावळ्यात कँडल मार्च
केतन अग्रवालच्या कुटुंबीयासह नागरिकांनी लोणावळ्यात कँडल मार्च काढला. यामध्ये केतन अग्रवाल याच्या आई वडिलांना लेकाच्या आठवणीत अश्रू अनावर झाले. केतन अग्रवालला न्याय मिळावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : Urea Shortage: खतासाठी पोलिसांचा पहारा! अन्नदात्यावर आली ‘ही’ भयंकर वेळ; सरकार नेमके करतंय काय?






