Supreme Court : विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई आणि हिंसाचाराची चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चाधिकार समिती स्थापन
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पाच सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली. समितीची धुरा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.सुभाष रेड्डी सांभाळतील.

Supreme Court : विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केल्याचे आणि पोलिसांना लक्ष्य करून हिंसाचार घडवण्यात आल्याचे आरोप आहेत. त्या प्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पाच सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली. समितीची धुरा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.सुभाष रेड्डी सांभाळतील.
समितीच्या इतर सदस्यांमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषीकुमार शुक्ला आणि मेघालयचे निवृत्त पोलीस महांसचालक एल.आर.बिष्णोई यांचा समावेश आहे. कॉक्राेच जनता पार्टीच्या (सीजेपी) पुढाकारातून दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात तीव्र आंदोलन झाले.
त्या आंदोलनाचा (Supreme Court) भाग म्हणून २० जुलैला संसदेवर मोर्चा आयोजित करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थी आंदोलक आणि दिल्ली पोलीस आमनेसामने आल्याने धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी, पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराचा मारा केला.
पॅलेट गन्सचाही वापर करण्यात आल्याच्या आरोपावरून आणखी सनसनाटी निर्माण झाली. त्याशिवाय, काही आंदोलकांनी आक्रमक बनत पोलिसांना लक्ष्य केल्याचाही दावा करण्यात आला. संबंधित घडामोडींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आता ठाम पाऊल उचलले आहे.






