“मुक्ता टिळक यांच्या जाण्याने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले”; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

नागपूर : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,”कसबा मतदार संघाच्या आमदार, आमच्या सहकारी मुक्ता ताई टिळक यांचं दुखत निधन झालं आहे, आज अतिशय आमच्यासाठी व पक्षासाठी दुःखाची बातमी आहे. पुण्याच्या राजकीय पटलावर, अतिशय संघर्षशील नेतृव , नगरसेवक , आमदार म्हणून, महापौर म्हणून सामान्य नागरिकांसाठी त्यांचे कार्य होते.”असे म्हटले.
तसेच टिळक घराण्याचा वारसा अतिशय समर्थपणे त्या निभावत होत्या. तीस वर्ष भाजपमध्ये कार्यरत असताना सामान्य कार्यकर्ता म्हणून ते आमदार पर्यंत त्यांनी पद भूषवले. मला असं कधी वाटलं नव्हतं की त्या अर्ध्या वाटेत आम्हाला सोडून जातील. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या वेळेस त्यांची तब्ब्येत खराब असताना देखील त्या मतदान करण्यासाठी आयसीयूमधून आल्या.
विधानपरिषदेच्या दिवशी मी त्यांना विनंती केली की, एखादी जागा आपण हरली तरी चालेल पण तुम्ही मतदान करण्यासाठी येऊ नका तुमचा जीव महत्त्वाचा आहे. पण तरी त्यांनी हट्ट धरला की पक्षाला माझी गरज आहे आणि मी येणार आणि येऊन त्यांनी मतदानही केले.
अशा प्रकारचे एक समर्पित नेतृत्व निघून जाणं ही त्या पक्षाची समाजाची मोठी हानी आहे. आणि ही हानी न भरून न निघण्यासारखी आहे. आज मुख्यमंत्री सभागृहामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि मी पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.





