पुरंदर विमानतळाला पुन्हा एकदा विरोध करण्यासाठी काही बाधित गावातील नागरिकांनी पंचायत समिती पुरंदर कार्यालावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यामातून विमानतळाला विरोध असल्याचे नागरिकांनी दाखवून दिले. हातात काळे झेंडे, बोर्ड घेऊन नागरिकांनी आमचा विमानतळाला विरोध असल्याचे सांगत पंचायत समितीच्या इमारतीबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. २०१६ साली राज्य सरकारने अधिसूचना काढत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा केली. पार्श्वभूमी त्यानंतर ज्या भागात हे विमानतळ उभे राहणार आहे, त्या भागातील नागिरकांनी विमानतळाला विरोध केला. भूसंपादन कसे करणार, शेतकऱ्यांना याचा किती मोबदला देण्यात येणार यासारख्या अनेक मागण्या या भागातील नागरिकांनी मांडल्या. त्यानंतर पुढे अनेकवेळा विमानतळाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा विमानतळाला विरोध करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या विरोधामागची कारणे काय आहेत, विमानतळामुळे किती गावे बाधित होणार आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप, विमानतळामुळे प्लॅाटिंग व्यवसायला फुटलेले पेव आदी गोष्टी सविस्तर पाहणार आहोत. विरोध अन् समर्थ, नाण्याच्या दोन बाजू २३ सप्टेंबर २०२६ रोजी पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी काहींनी विमानतळ आपल्या तालुक्यात झाले तर तालुक्याचा कायापालट होईल, स्थानिकांच्या हाताला काम मिळेल, रहदारी वाढेल याचा फायदा तालुक्यातीलच नागरिकांना होणार असल्याचे सांगितले. यामुळे काहींचा विमानतळाला विरोध काहींचे समर्थन असे चित्र दिसून आले. नंतरच्या काळात विरोध जास्त असल्याचे कारण समोर आले आणि हे आतंरराष्ट्रीय विमानतळ बारामतीला हलवण्यात येणार अशा चर्चा रंगू लागल्या. जी जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आलेली आहे, त्या जागेवर विमानांचे नाईट लँडिग करताना अडचणी येत असल्याचे कारण विमानतळासाठी दुसरी जागा बारामती येथील जागेला पसंती दिल्याच्या काही बातम्या देखील देण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांचे म्हणणे काय? नुकतेच बाधित असलेल्या शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच सरकाला अनेक प्रश्न केले आहेत. २३ सप्टेंबर २०१६ रोजी शासनाने विश्वासात न घेता हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रोजेक्ट पुरंदरमध्ये आणला. यामुळे काही बाधित गावांचा विरोध या विमानतळाला आहे. त्या दृष्टीने गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतल्या. आमच्या गावात विमानतळ नको म्हणून ग्रामसभेत ठराव मंजूर करून शासनाला वेळोवेळी पाठवले. गेल्या १० वर्षांपासून विमानतळाला आमचा विरोध आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली, रस्ता रोको करण्यात आला. पुण्याला देखील मोर्चा काढण्यात आला. यामुळे पुन्हा विरोध दर्शवण्यासाठी सर्व शेतकरी एकत्रित आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सांगितले की भूसंपादन करा. यासाठी बारामतीच्या समतीच्या कार्यालयात चौकशीसाठी आम्ही गेलो. तुमच्याकडे भूसंपादन करण्याचे आदेश आले आहेत का? भूसंपादनाची नेमकी प्रोसेस काय आहे? यावेळी आम्हाला अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला निधी येतो. त्यानंतर आमच्याकडे विकासाचा टप्पा येतो, असे उत्तर देण्यात आल्याचे एका नागरिकाने सांगितले. बाधित गावांची सीमा निश्चिती पारगांव १ हजार ३७ हेक्टर म्हणजेच २ हजार ५९२ एकर, उदाची वाडी २६१ हेक्टर म्हणजेच ६२५ एकर, गुंजवडी १४० हेक्टर म्हणजेच ३५७.५ एकर, एखतपूर २७१ हेक्टर म्हणजेच ६७७.५ एकर, खानवडी ४८४ हेक्टर म्हणजेच १ हजार दहा पूर्णांक ५ एकर, कुंभारवळ ३५१ हेक्टर म्हणजेच ८२७.५ एकर, वनपुरी ३३९ हेक्टर म्हणजेच ८४७.५ एकर अशी सीमानिश्चित करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून असे लक्षात येते की सर्वांत जास्त बाधित गाव पारंगाव हे आहे. तर वनपुरी या गावात सर्वांत जास्त वाड्या, वस्त्या आहेत. ७० टक्के नागरिकांचा विरोध असल्या…. विमानतळामुळे घरे, झाडे आदी गोष्टींची हानी होणार आहे. त्यामुळे २०१३ च्या कायद्यानुसार गावठाण पुर्नवसित करा. गावठाणात आता थोडी घरे राहिले आहेत. लोकं वाड्या वस्त्यांवर राहिला गेली आहेत. या लोकांना पुर्नवसन कायदा लागू पडत नाही. शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न यामुळे निर्माण होणार आहेत. वनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर नष्ट होणार आहे. या भागात अंजीर बाग, सिताफळ बाग, डाळिंब बाग आदी बागा आणि इतर शेती आहे ती देखील यामुळे जाणार आहे. यामुळे या ठिकाणी विमानतळ उभे राहणार आहे त्या भागातील ७० टक्के नागरिकांचा प्रोजेक्टला विरोध असेल तर प्रोजेक्ट होऊ शकत नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. तसेच जागेच्या बाजारभावाची घोषणा करावी अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. स्वेच्छा भूसंपादन पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे आहेत. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर स्वेच्छा खरेदीने भूसंपादन केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. तसेच तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जवळच १४०० एकर गायरान जमीन आहे, या गायरान जमिनीवर आयटी पार्क करून स्थानिकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे. तसेच भूसंपादनाचा मोबदला निश्चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारी देखील पूर्ण झाली आहे. आघाडीच्या काळात पर्यायी जागीच निवड पण केवळ भूसंपादनासाठीचा निर्णय प्रलंबित होता. या तालुक्याचे तत्कालीन आमदार संजय जगताप यांनी आणि काही स्थानिकांनी विमानतळाला विरोध दर्शवला होता. विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वेच्या दिशेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागा महाविकास आघाडीचे सरकाराने निश्चित केली. या नव्या जागेला संरक्षण विभागाने परवानगी नाकारली. त्यामुळे हा प्रश्न अधांतरी राहिला होता. आता पुन्हा एकदा याच जागेवर विमानतळ होणार हे निश्चित झाले आहे. तसेच विमानतळाबरोबच या ठिकाणी मल्टीमॅाडेल लॅाजिस्टिक हब असल्याचे प्रस्तावित करण्यात अल्याचे सांगितले जात आहे. २०२९ पर्यंत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत येथे काही दिवसांपूर्वी बैठक घेत राज्यातील ३३ विमानतळ आणि पुरंदर विमानतळाच्या बाबतीत चर्चा केली. जवळपास साडेतीन तास ही बैठक सुरू होती. मोहोळ यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत २०२९ पर्यंत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झालेले असेल असे सांगितले. तसेच राज्यातील काही छोटी, मोठी आणि खाजगी विमातळांचा यामध्ये समावेश होतो. या विमानतळासाठी नाईट लायडिंग, रिगार्मिंग, रनवे, टर्मिनल एक्सपान्सन आणि पायाभूत सुविधा असे प्रश्न आहेत, ते प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पुढारी, एजंट अन् दलाल पुरंदर विमानतळबाबत अनेक शेतकऱ्यांची घरे जाणार असून ते विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुर्नवसन कसे केले जाणार हा आणि इतर प्रश्न प्रलंबित असताना स्थानिक पुढारी, एजंट आणि दलाल यांच्या माध्यातून हजारो एकर क्षेत्र बाहेरील गुंतवणूदाराला विकले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात मोठ्या प्रमाणावर बाहेरील गुंतवणदारांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. हे दुसरे तिसरे कोणी नसून गावातीलच स्वयंघोषित पुढारी, नेते असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना फूस लावून चांगले भाव मिळतात विकून टाक असे सांगितले जात आहे. शेतकरीही त्यांच्या बोलण्याला बळी पडून जमिनी विकत आहेत. आंदोलन उग्र रुप धारण करेल वरकरणी सांगायचे झाल्यास पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असे असली तरी मग विस्तापितांना कशाप्रकारे सामावून घेतले जाणार आहे. बाजाराभाव किती दिला जाणार आहे. विस्तापितांचे पुर्नवसन कसे केले जाणार आहे. आदी प्रश्न विचारले जात असून याबद्दल लवकरात लवकर माहिती देण्यात यावी, अशी शेतकरी, नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा विरोध आणखी उग्र रुप धारण करेल….