Elections to local bodies : मुंबई कोणाची? स्था. स्व. सं. निवडणुकीत युती आघाडीकडून जोरदार तयारी; कोण काय करतंय? वाचा….

विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत युतीमधील तिन्ही घटक पक्षांना विजयाचा ‘बुस्ट’ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार नाही. तर दुसरीकडे आघाडीला या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. युतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मंत्र्यांकडून जनता दरबार भरवले जात आहेत. पक्षातील तळागळाच्या कार्यकर्त्यांनामार्फत मोर्चेबांधणी व रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. आघाडीच्या गोठ्यात मात्र शांतताच दिसत आहे. बड्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे प्रयत्न चालू आहेत. ते किती फळाला येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोण काय करतंय याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा….
डेडिकेटेड टू कॅामन मॅन
महायुतीमधील सर्वात पहिल्यांदा आपण शिवसेना शिंदे गटाबद्दल बोलूयात.. शिवसेना (शिंदे) पक्षाची विधानसभेची कामगिरी चांगली राहिली. पक्षाच्या ५७ जागा निवडून आल्या. घवघवीत यश पक्षाला मिळालं. शिवसेनेचे प्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच नाव घेतले जाऊ लागले. शिंदेंची कॅामन मॅन ही प्रतिमा मुख्यमंत्री पद गेल्यानंतर डेडिकेडेट टू कॅामन मॅन अशी झालेली आहे. त्यांची ही प्रतिमा त्यांचे कार्यकर्ते पुढे नेत आहेत. शिवेसनेच्या मेळाव्यांमध्ये शिंदेंच्या तोंडून भाषणात डेडिकेटेड टू कॅामन मॅम अशी उपाधी दिली जात आहे. आपल्याजळ मुख्यमंत्री पद नसले तरी शिंदेंची ही प्रतिमा मी सतत तुमच्यासाठी म्हणजेच लोकांसाठी काम करणारी आहे, असे शिंदे सांगू पाहत आहेत.
ग्राऊंडहोल्डसाठी अनेक प्रयत्न
शिंदेच्या शिवसेनेते मंत्र्यांना लोकांची कामं करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यादृष्टीने पक्षातील मंत्री कामाला लागले आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या कार्यालयात जनता दरबार भरवण्यात येत आहेत. या जनता दरबारामध्ये लोकांची गाऱ्हाणी ऐकूण घेतली जात आहेत. एकप्रकारे आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे या जनता दरबारमधून सांगितले जात आहेत. शिवेसना (शिंदे) पक्षाला मुबंई महापालिकेवर आपले एकहाती वर्चेस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. यात राज्यभरात टॅायगर अॅापरेशनची जोरदार चर्चा केली जात आहे. मुंबई कुणाची या प्रश्चाच्या उत्तरासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट पाहवी लागेल. एवढ मात्र नक्की. शिवसेना शिंदे पक्षाकडून मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणचा ग्राऊडहोल्ड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुन्हा मोठा भाऊ भाजप?
भाजप विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरला आणि राज्यात तब्बल १३२ जागा या पक्षाने मिळवल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने तळागळातील कार्यकर्त्यांवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. पक्षाच्या वतीने मुंबईसाठी आणि इतर ठिकाणी ‘मिशन महापौर’ सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून इतरही पक्षातील लोकांना भाजपमध्ये समावून घेतले जात आहे. एका अर्थाने त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जात आहे. पक्षातील ग्राऊंड पातळीवरचा होल्ड मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आशिष शेलारांचे सूचक विधान
गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सूचक विधान केले होते. ते म्हणाले होते की एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी महापालिकेचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात आणखी काही राजकीय समीकरणे बदलतात का हे पाहवे लागेल, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणखी कोणती राजकीय गणितं होणार का, यावर अनेक चर्चा करण्यात येत आहेत. त्यामुळे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कोणती रणनिती आखणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
विधानसभेला कामगिरी चमकदार, पण…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभेची कामगिरी चमकदार राहिली. पक्षात सध्याच्या घडीला इन्कमिकिंग वाढले असल्याचे दिसत आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्षावर मोठे संकंट आल्याचे बोलले जात आहे. दररोज वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे हे प्रकरण आगामी काळात हे प्रकरण कोणते वळण घेणार, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही अडचणींचा सामाना करावा लागणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अजित दादांचं सूचक विधान बरंच सांगून जातं
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात सूचक विधान केले आहे. नुकताच देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे कौतुक अजित पवार यांनी केले. केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, तरुण आणि लाडक्या बहिणींच्या हिताचा अर्थसंकल्प असणार असल्याचे विधान त्यांनी केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक महत्वाची खाती असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. यामुळे मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील मध्यमवर्गांवर सरकार कृपादृष्टी दाखवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसे झाल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची इमेज पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचे इमेज वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला होऊ शकतो.
अतर्गंत धूसफूस कायम
लोकसभेला आघाडीतील तिन्ही घटक पक्षांने चांगली कामगिरी करत आपले उमेदवारी निवडून आणले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाला अनेक धक्के बसले परिणामी अनेक ठिकाणच्या जागा गमवण्याची वेळी आघाडीतील पक्षांवर आली. मुबंईवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उबाठा गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यातील इतर ठिकाणी मात्र उबाठा गट इतर पक्षांशी जळवून घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आघाडीत वरवर जरी आलबेल वाटत असले तरी अंतर्गत धुसफुस कायम असल्याचे दिसत आहे. यातही आपल्या पक्षाची इमेज क्लीन ठेवण्यासाठी आघाडीतील बडे नेते प्रयत्न करत आहेत. यामुळे निवडणुकीला हे तिन्ही पक्षाचे नेते वरच्या पातळीवर अजिस्ट करून घेणार की आणखी काय होणार याचे चित्र निवडणुकीच्या पूर्वी स्पष्ट होईल.
कार्यकर्त्यांची ढाल
आघाडी असो किंवा युती प्रत्येक पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्राऊंड होल्डवर मजबूत पकड निर्माण करायची आहे, यामुळे सर्वच पक्ष त्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. या उक्तीप्रमाणे कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हे कार्यकर्तेच त्यांच्या पक्षाची ‘ढाल’ बनून उभे राहणार आहेत. या ढालीला शेवटपर्यंत मजबूत ठेवण्याचे काम सर्व पक्षांना करावे लागणार आहे……





