बाळासाहेब ठाकरेंच्या जीवाला सर्वात जास्त धोका कुणापासून होता? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं सांगितलं कारण….

मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ताने विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव ‘उद्धव ठाकरे’ यांचं नाव नसल्याने ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मात्र, आता अश्यातच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान केलं असून त्याच हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. यावेळी त्यांनी नाव घेता शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. एका कार्यक्रमादरम्यान दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता शिकविली ती मला त्यांच्या पश्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दिसत आहे. बाळासाहेबांनी घडविलेला शिवसैनिक मला दिसतो..’ असं दीपक केसरकर म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “बाळासाहेब यांचे हिंदुत्व हे तत्त्व होते. जो जो हिंदुस्थान झिंदाबाद म्हणतो तो बाळासाहेबांचा शिवसैनिक असतो. जो पाकिस्तान झिंदाबाद, खलिस्तान झिंदाबाद म्हणत होते त्याला ते हिंदू मानत नव्हते. म्हणून भारतात सर्वात जास्त धोका बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला होता”. असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.





