Ramdas Kadam : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोड घडत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कराव जाधव यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांच्यावर २००९ मध्ये काळीविद्या वापरली, अघोरी पूजा असा सनसनाटी आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपाला रामदास कदम यांनी त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून, कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. रामदास कदम काय म्हणाले ? अरे भास्कर तुझ्या घरातील कोणती महिला लिंबू आणि नारळ घेऊन जायची असं सांगत आमच्या घेरा पालगडला खेडमध्ये एक मौर्य वाडी आहे. तिथे एक विष्णू ओक बुवा होता तो आता हार्ट अटॅकने गेला. 2009 मध्ये तुझ्या घरातली कुठली महिला लिंबू आणि नारळ घेऊन जायची त्याच्याकडे ते नाव सांगितलं तर महाराष्ट्र हादरेल तुझी अडचण होईल, असा सूचक इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. त्या महिलेसोबत कोण यायचं खेडचा काँग्रेसचा तालुकाध्यक्ष त्याचं नाव पण मी सांगेन असे कदम म्हणाले आहेत. काळी विद्या करून तू आणि तुझी फॅमिली दमली तू कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवतोयस? अशा शब्दांत रामदास यांनी भास्करराव जाधव यांना सुनावले आहे. हेही वाचा :इराण-इस्रायलमधील युद्धबंदीवर मेहबूबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया ; म्हणाल्या,”इस्लामिक देशांमध्ये…”