‘कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित आणि मराठी क्रिकेटपटू?’; हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राऊतांचा सवाल

Sanjay Raut | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. त्याचदरम्यान राज्य सरकाराने १७ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा हिंदी किंवा त्याऐवजी कोणतीही एक भारतीय भाषा घेण्यासंदर्भात पत्रक काढले. राज्यभरातून या निर्णयाविरोधात अनेकांनी विरोध दर्शविला आहे.
यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. Sanjay Raut |
हिंदी भाषेचा दबाव सुरू
पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी मराठी कलाकार आणि क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे. “साहित्यिकांची मुले आणि नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात. काहींची मुले तर परदेशात आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही सांगू नका. बैठका घेण्याची काहीही गरज नाही. हिंदी भाषेचा दबाव सुरू आहे, त्या विरोधात साहित्यिक, सेलिब्रिटी पेटून उठले असते,” असे संजय राऊत म्हणाले.
“दक्षिणेत प्रकाश राज या विरोधात रोखठोक बोलत आहेत. पण इथे महाराष्ट्रात कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित आणि मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे, पण मराठीवर असे हल्ले होत असताना तुम्ही सर्वजण गप्प आहात,” अशा शब्दांत संजय राऊतांनी मराठी सेलिब्रिटींवर हल्लाबोल केला. Sanjay Raut |
सर्व साहित्यिकांची मुले परदेशात…
“साहित्यिकांच्या बाबतीत आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहेत की, ९०% पुरस्कार प्राप्त आणि लाभार्थी हे सरकारचे लाचार आहेत. या सर्व साहित्यिकांची मुले परदेशात शिकत आहेत किंवा शिकून आलेली आहेत. या मुलांना ना मराठीचा गंध आहे ना हिंदीची जाण आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या सर्व नेत्यांची मुले विदेशी शाळांमध्ये शिकत आहेत,” असेही संजय राऊत म्हणाले.
“मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या. मला यावर बोलण्याचा अधिकार आहे. आमची मुलं मराठी शाळेत शिकले आहेत. किती भाजपावाल्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत त्यांच्या याद्या काढा. हिंदी भाषिक पट्ट्यात हिंदी शाळा बंद पडत आहेत, मोदींनी आधी तिथे काम करणं आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रत हिंदी संपंन्न आहे, आम्हाला हिंदी कधी शिकवायला लागली नाही,” असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा:
दीपिकाच्या आठ तास काम करण्याच्या मागणीवर सोनाक्षीने व्यक्त केली भूमिका





