मुंबई – बॉलीवूडमधील कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनाने केली आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत बॉलिवूडमधील कंपूशाहीवर निशाणा साधला होता. यातच आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
या प्रकरणात महेश भट आणि करण जोहरची चौकशी कधी होणार? असा प्रश्न पोलिसांना विचारला आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी महेश भट आणि करण जोहरची चौकशी कधी होणार असा सवाल कंगना रणौतने उपस्थित केला आहे. एका वृत्त माहितीनुसार दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हा प्रश्न उपस्थित केला.
महेश भट आणि करण जोहर यांना सुशांतच्या आत्महत्येविषयी कधी प्रश्न विचारण्यात येतील? असंही कंगनाने विचारलं आहे. अजूनही परवीन बाबीचा मृत्यू कसा झाला ते आपल्या सिनेमांद्वारे महेश भट विकत आहेत. भावनाशून्य गिधाडं आहेत असे लोक, जे लोकांना मरताना पाहू शकतात अशीही टीका कंगना रणौतने केली आहे.
याआधीही कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करुन सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर त्याचा बळी घेतला गेला आहे अशी रोखठोक भूमिका मांडली आहे.