मुंबई – भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू सातत्याने विविध सामन्यांतून किंवा मालिकांमधून विश्रांती घेताना दिसतात. ही विश्रांती म्हणजे काय भानगड आहे, असा संतप्त सवाल विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरीही त्यात भारतीय संघाकडून झालेल्या काही चुका दुर्लक्षीत करता येणार नाहीत. या संपूर्ण सामन्यात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज महंमद शमीने दोन्ही डावांतू मिळून केवळ 16 षटके गोलंदाजी केली. त्याला इंदूरच्या कसोटीत विश्रांती दिली गेली होती. हे सगळे काय चालले आहे. बरे त्याला विश्रांती दिली व त्यानंतर त्याला अहमदाबाद कसोटीत खेळवले गेले तरीही त्याला इतकी कमी षटके का दिली गेली. तो तर पूर्ण तंदुरुस्त आहे मग विश्रांती कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे.
नवा चेंडू व जुना चेंडू सातत्याने स्विंग करण्याची त्याची क्षमता अफाट आहे. असा गोलंदाज संघात प्रत्येक लढतीसाठी अशणेही तितकेच महत्वाचे आहे. संघातील फिरकी गोलंदाज बळी मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत म्हणून शमीला विश्रांती देण्याचे कारण काय. काही वेळा फिरकी गोलंदाजांना अपयश येत असताना शमीनेच अनेकदा यश मिळवून दिले आहे. खरेतर या गोष्टी संघाच्या बैठकीत चर्चिल्या गेल्या पाहीजेत. सध्या भारतीय संघात या चर्चा तरी होतात का हाच मुळात प्रश्न आहे, असेही गावसकर म्हणाले.
Border Gavaskar Trophy 2023 : कसोटी मालिकेत ‘आर. अश्विन’च ठरला सर्वात भारी
अस्त्र म्हणून वापर करा
शमीसारखा गोलंदाजा एकाच दिवसात जास्त षटके टाकत असेल तर ते देखील योग्य नाही. अनेक देशांचे संघ त्यांच्या प्रमुख गोलंदाजाचा वापर अस्त्र म्हणून करतात. त्यांना दिवसभरात 20 षटके गोलंदाजी देतानाही पाच ते सहा षटकांचा एक स्पेल दिला जातो, त्यामुळे हा गोलंदाज संपूर्ण दिवस ताजातवाना राहतो, येत्या काळात हेच शमीबाबतही घडले पाहीजे, असेही गावसकर म्हणाले.