Atul Kulkarni : “तुमचा विरोध नेमका कशासाठी”; सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अतुल कुलकर्णी संतापले
Atul Kulkarni : अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

Atul Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. तब्बल २० दिवसांहून अधिक काळ उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.
१८ जुलै रोजी अचानक दिल्ली पोलिस आंदोलस्थळी दाखल झाले आणि त्यांनी वांगचुक यांना ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेक सेलिब्रिटींनीही सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच आंदोलन दडपण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा देखील केला जात आहे.
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी यापूर्वीही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देत स्वतः एक दिवसाचे उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
Sanjay Raut : “एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल “; राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करत लिहिले, “विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुमचा विरोध नेमका कशासाठी आहे? वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि त्यातून वाढणारा मानसिक ताण व आत्महत्यांच्या घटना हे वास्तव नाही का? या सर्वाची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि उत्तरं दिली पाहिजेत. मग ‘जबाबदारी घ्या, उत्तरं द्या’ अशी मागणी करणं चुकीचं कसं?” असा संतप्त सवाल अतुल कुलकर्णी यांनी विचारला आहे.
यासोबतच त्यांनी विरोधकांना उद्देशून, “तुमचा विरोध नेमका कशाला आहे, हे स्पष्टपणे सांगितलंत तर समजून घ्यायला बरं पडेल.” पोस्टच्या शेवटी अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांबाबतही भाष्य केले.” नेहमीप्रमाणे असभ्य भाषेत कमेंट्स येऊ लागल्या तर नाईलाजाने मला पुन्हा कमेंट सेक्शन बंद करावं लागेल.” असे पोस्टच्या शेवटी अतुल यांनी लिहिलं आहे.





