‘नरेंद्र मोदी मला काय म्हणाले ‘भटकता आत्मा’… हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही’ – शरद पवार

Sharad Pawar । नुकताच राष्ट्रवादी पक्षचा वर्धापन दिन शरद पवार गटाने नगरमध्ये तर अजित पवार गटाने मुंबईत पार पाडला. यावेळी दोन्ही गटाने अनेक मुद्द्यांवर भाष्य केल. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने आठ जागा जिंकल्या. तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली. यावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आठही खासदार महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची काळजी घेतील याची खात्री मी देतो, असं विधान केलं आहे.
शरद पवार राष्ट्रवादीच्या आठ खासदार बाबत म्हणाले,…
‘आपण हा देश कसा प्रगतीच्या मार्गावर न्यायचा हा विचार करूया. यासाठी आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर राम मंदिराचा प्रश्न महत्त्वाचा राहिल पण भाजपवाल्यांनी राम मंदिराचा वापर राजकारणासाठी केला गेला. मात्र अयोध्येच्या जनतेने त्यांना दाखवून दिलं. या पक्षाचे सर्व खासदार तुमच्या राज्याचे जिल्हे आणि राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान बनलं होतं तसंच राष्ट्रवादीचे आठही खासदार महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची काळजी घेतील याची खात्री मी देत’ असेही ते म्हणाले आहे.
शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर भटकती आत्मा या वक्तव्यावरून घणाघाती टीका…
या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भटकती आत्मा या वक्तव्यावरून घणाघाती टीका केली. ते म्हणाले,’नरेंद्र मोदी मला काय म्हणाले हा भटकता आत्मा आहे, एकादृष्टीने ते बरोबरच बोलले कारण, आत्मा हा कायम राहतो आणि हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेल्या शिवसेनेला नकली म्हणून उल्लेख केला, हे बोलणं शोभतं का? एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांची पार्श्वभूमी नकली असल्याचं पंतप्रधानांनी बोलायचं. सत्ता मिळायची शक्यता नसली की माणूस बेफाम आमि अस्वस्थ कसा होतो तशी स्थिती त्यांची झाली. हे सर्व विसरून जाऊया.’ असं म्हणत पवारांनी निशाणा साधला.





