West Bengal Exit Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Exit Poll) निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना, एक्झिट पोल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. देशातील अग्रगण्य आणि विश्वसनीय मानली जाणारी सर्व्हे एजन्सी आक्सिस माय इंडिया ने बंगालचा एक्झिट पोल जाहीर न करण्याचा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एजन्सीने (West Bengal Exit Poll) सांगितले की, मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात अनाकलनीय शांतता आणि गुप्तता दिसून आल्याने अचूक आकडेवारी मिळवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे चुकीचे अंदाज देऊन संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू नये, म्हणून त्यांनी हा एक्झिट पोल पूर्णपणे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. आक्सिस माय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले, “सर्व्हेदरम्यान सुमारे ६० ते ७० टक्के मतदारांनी आपली पसंती उघड करण्यास स्पष्ट नकार दिला. West Bengal Exit Poll जेव्हा जनता आपले मत उघडपणे सांगत नाही, तेव्हा कोणतेही आकडे प्रसिद्ध करणे (West Bengal Exit Poll) चुकीचे आणि जबाबदारीचे ठरेल. अशा परिस्थितीत चुकीचे अंदाज देऊन आपल्या संस्थेच्या दीर्घकालीन विश्वासार्हतेवर गदा येऊ नये, म्हणून आम्ही डेटा जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.” विक्रमी मतदानाने सस्पेन्स वाढला बंगालमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात अभूतपूर्व उत्साह दिसून आला. दुसऱ्या टप्प्यात ९१.६६ टक्के तर पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदान झाले. दोन्ही टप्प्यांचा सरासरी मतदानाचा आकडा ९२.४७ टक्के इतका झाला आहे. यामुळे २०११ च्या ८४.७२ टक्के मतदानाच्या विक्रमाला मोडीत काढला गेला आहे. विशेष बाब म्हणजे, यावेळी महिला मतदार पुरुषांपेक्षा अधिक सक्रिय दिसल्या. महिलांचा मतदानाचा टक्का ९२.८ टक्के तर पुरुषांचा ९१.०७ टक्के इतका नोंदवला गेला. इतर एजन्सींचे अंदाज मात्र वेगवेगळे आक्सिस माय इंडियाने माघार घेतली असली तरी, इतर काही संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. मात्र, त्यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे: जनमत सर्व्हे : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) १९५-२०५ जागा (बहुमत), भाजप ८०-९० जागा. प्रजा पोल : भाजप १७८-२०८ जागा (बहुमत), टीएमसी ८५-११० जागा. NDTV पोल ऑफ पोल्स : भाजप १३७ जागा, टीएमसी १५१ जागा (कांटे की टक्कर). एकूणच, आक्सिस माय इंडियाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे बंगाल निवडणुकीतील सस्पेन्स अधिकच वाढला आहे. आता सर्वांच्या नजरा ४ मे रोजी येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.