नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. रविवारी दिल्लीतील मंगेशपूरमध्ये तापमानाने 49 अंशांचा टप्पा पार केला. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीतील मुंगेशपूर स्थानकात 49.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नजफगढमध्ये 49.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच मयूर विहारमध्ये सर्वात कमी तापमान होते. येथील कमाल तापमान 45.5 अंश सेल्सिअस होते.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने धुळीचे वादळ किंवा गडगडाटासह आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने याआधीच उष्माघाताचा इशारा दिला आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे हवामान खात्याने सांगितले आहे. शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे. आवश्यकतेनुसार बाहेर जाताना सतत पाणी प्यावे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. सोमवारी दिल्लीत वादळ किंवा धुळीचे वादळ येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
दुसरीकडे, हरियाणातील गुरुग्राममध्येही आज 48.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 10 मे 1966 नंतर शहराचे तापमान 49 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.