वक्फ कायद्याविरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! पोलिसांवर दगडफेक अन् जाळपोळ ; जाणून घ्या आता परिस्थिती कशी ?

Waqf Law Protest । पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये काल वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच अनेक वाहनांची जाळपोळ देखील केली. त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत केली. गर्दी नियंत्रित करताना सुमारे १० पोलिस जखमी झाले. दरम्यान, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी, सुती आणि शमशेरगंज भागातील परिस्थिती सामान्य झाली आहे. पोलिसांनी गर्दी पांगवली आहे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. दंगेखोरांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. तसेच, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे.
#WATCH | Bengaluru: West Bengal Governor CV Ananda Bose says, “I have been receiving disturbing reports about some people taking law and order in their hands in some parts of Bengal. Protest is welcome under democracy, but not violence. Public order cannot be disturbed and the… pic.twitter.com/MlSYsKhwHb
— ANI (@ANI) April 11, 2025
निषेध हिंसक कसा झाला? Waqf Law Protest ।
एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोक शमशेरगंजमध्ये जमले आणि त्यांनी वक्फ कायद्याविरुद्ध निदर्शने सुरू केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ रोखला. काही लोकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने निदर्शनाला हिंसक वळण लागले, ज्यामुळे पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला. दुसरीकडे, मालदामध्ये, निदर्शकांनी रेल्वे रुळांवर धरणे दिले, ज्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाल्या. पूर्व रेल्वेच्या फरक्का-अजीमगंज सेक्शनवरही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
राज्यपालांनी सरकारला केले ‘हे’ आवाहन
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. संवेदनशील भागात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आनंद बोस यांनी राज्य सरकारला केली आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला याबद्दल भीती वाटत होती, म्हणून आम्ही मुख्यमंत्री कार्यालयालाही माहिती दिली होती.
अनेक गाड्या रद्द Waqf Law Protest ।
या निदर्शनानंतर रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. पूर्व रेल्वेने सांगितले की, “आज (११ एप्रिल २०२५) पूर्व रेल्वेच्या अझीमगंज – न्यू फरक्का मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. दुपारी २:४६ वाजता धुलियानगंगा स्थानकाजवळ सुमारे ५००० लोक रेल्वे ट्रॅकवर बसले होते. यामुळे कामाख्या पुरी एक्सप्रेस आणि इतर अनेक गाड्या मार्गात अडकल्या. पुढे जाणारा मार्ग स्पष्ट नसल्याने बरहरवा-अझीमगंज पॅसेंजर ट्रेन देखील बल्लाळपूर स्थानकावर थांबवण्यात आली आहे.” रेल्वे पोलिस, जीआरपी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि निदर्शकांशी बोलत आहेत. रेल्वेने म्हटले आहे की अशा प्रकारे गाड्या थांबवल्याने प्रवाशांची खूप गैरसोय होते आणि गाड्यांच्या वेळेतही व्यत्यय येतो.
बीएसएफ जवान तैनात
बीएसएफचे डीआयजी आणि दक्षिण बंगाल फ्रंटियरचे पीआरओ निलोप्तल कुमार पांडे यांनी सांगितले की, वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आज मुर्शिदाबादच्या जांगीपूरमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बीएसएफने तातडीने सकारात्मक पावले उचलली. परिसरात शांतता आणि सामान्यता पूर्ववत व्हावी यासाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.





