Health Tips: गोड खायचंय? मग योग्य वेळ जाणून घ्या; नाहीतर वाढू शकतो मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका
Health Tips रक्तातील साखरेतील हा चढ-उतार शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे वारंवार भूक लागणे, अशक्तपणा जाणवणे, थकवा येणे आणि पुन्हा गोड खाण्याची इच्छा होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ही सवय दीर्घकाळ राहिल्यास वजन वाढण्याचा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Health Tips: गोड पदार्थ खायला जवळपास प्रत्येकालाच आवडतात. सण, वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग असो, मिठाईशिवाय तो अपूर्ण वाटतो. मात्र गोड किती खाता यापेक्षा ते कोणत्या वेळी खाता, हे आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. चुकीच्या वेळी गोड पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. तसेच लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी बिस्किटे, चॉकलेट, मिठाई किंवा इतर गोड पदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते. मात्र ही सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी गोड खाल्ल्याने त्यातील साखर रक्तात झपाट्याने मिसळते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि काही वेळानंतर ती तितक्याच वेगाने कमीही होते. (Health Tips)
रक्तातील साखरेतील हा चढ-उतार शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे वारंवार भूक लागणे, अशक्तपणा जाणवणे, थकवा येणे आणि पुन्हा गोड खाण्याची इच्छा होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ही सवय दीर्घकाळ राहिल्यास वजन वाढण्याचा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. (Health Tips)
तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ खायचेच असतील तर ते मुख्य जेवणानंतर मर्यादित प्रमाणात खाणे अधिक योग्य ठरते. जेवणात डाळ, भाजी, पोळी, भात, सॅलड किंवा इतर पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यामुळे गोडातील साखर शरीरात हळूहळू शोषली जाते. (Health Tips)

Health Tips: गोड खायचंय? मग योग्य वेळ जाणून घ्या; नाहीतर वाढू शकतो मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका
फायबर आणि प्रथिने हे रक्तातील साखर झपाट्याने वाढू देत नाहीत. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही आणि इन्सुलिनचे संतुलनही चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ जेवणानंतर कमी प्रमाणात गोड खाण्याचा सल्ला देतात. (Health Tips)
रात्रीच्या वेळी मात्र जास्त प्रमाणात गोड खाणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात. कारण रात्री शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जाण्याची तयारी करत असते. अशा वेळी अतिरिक्त साखर आणि कॅलरी शरीरात साठण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वजन वाढणे, रक्तातील साखरेची पातळी बिघडणे आणि चयापचयावर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. (Health Tips)
वैज्ञानिक अभ्यासानुसार, रात्री वारंवार गोड खाण्याची सवय पुढे अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे शक्यतो रात्री उशिरा मिठाई, केक, चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाणे टाळावे. (Health Tips)
जर गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर दुपारच्या जेवणानंतर मर्यादित प्रमाणात गोड खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. दिवसभर शरीर अधिक सक्रिय असल्याने त्या वेळी मिळालेली ऊर्जा सहज खर्च होते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी साठण्याचा धोका कमी होतो. (Health Tips)
तज्ज्ञांचे आणखी एक महत्त्वाचे मत म्हणजे, गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि योग्य वेळी खाणे अत्यंत गरजेचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली यांसोबत गोड पदार्थांचे योग्य नियोजन केल्यास आरोग्य चांगले राखता येते. (Health Tips)





