नवी दिल्ली – खाद्यान्नावर जीएसटी लावण्याच्या आणि महागाईच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे पीलीभीत येथील खासदार वरूण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्या सरकारवर टीका केली आहे.
सरकारने जनहिताची पाउले उचलावीत जनतेचे कंबरडे मोडण्याची नाही; असे त्यांनी म्हटले आहे. दूध, आटा, डाळ, तांदुळ आदी आवश्यक वस्तूंवर जीएसटी लागू झाला आहे. मात्र दारु, पेट्रोल आणि डिझेलवर नाही.
या करप्रणालीचा सगळा बोजा जर सर्वसामान्यांवरच पडणार असेल तर ही प्रणाली लागू करण्याचा उद्देशच त्यात हरवला जातो. जीएसटीचे एक योग्य प्रारूप किंवा आराखडा हा केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळूनच करायला हवा, अशी सूचना वरूण गांधी यांनी केली. गेल्या काही काळात वरूण सातत्याने सरकारवर टीका करत असून विरोधी पक्ष वापरत नाहीत असे शब्द ते आपल्याच सरकारच्या विरोधात वापरत असल्याचे दिसून येते आहे.
पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे