मुंबई – सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बुधवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बांठिया अहवाल मान्य करत राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे.
मुंडे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात जो बांठिया आयोग नेमला गेला होता. तसेच न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ट्रिपल टेस्टबाबत जे काही निर्णय घेण्यात आले त्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे, त्याचे मी आणि आमचा पक्ष स्वागत करत असल्याच मुंडे म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
तसेच आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. तसेच आरक्षण मिळाले नाहीत तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे, त्याठिकाणी 27 टक्के ओबीसी उमेदवार दिले जाणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र न्यायालयाने सर्वसामान्य ओबीसी माणसाची भूमिका आयकून जो निर्णय दिला आहे त्याबद्दल आभार मानतो, असे मुंडे म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केले स्वागत