मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून 288 जागा लढण्याची तयारी ; ट्रायडेंट हॉटेलमधील बैठकीत मतदारसंघाचा आढावा

Uddhav Thackeray on Vidhansabha Election । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे संकेत दिले आहेत. याच संदर्भात काल मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली त्या बैठकीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंची 288 जागा लढण्याची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे विधानसभेची निवडणूक लढणार Uddhav Thackeray on Vidhansabha Election ।
दरम्यन, या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षांतील नेत्यांसोबत चर्चा करत 288 जागांचा आढावा घेतलाय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत लढवली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीसोबत राहून विधानसभा निवडणूक लढवल्यास आपल्या पारंपारिक आणि ताकद असलेल्या जागांवर निवडणूक लढावी लागणार आहे.
मुंबई, कोकण आणि मराठवाडा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला Uddhav Thackeray on Vidhansabha Election ।
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबई, कोकण आणि मराठवाडा मानला जातो. दरम्यान, काँग्रेस आणि शरद पवारांना किती जागा सोडल्या जाऊ शकतात, याबाबत ट्रायटेंड हॉटेलवर विचारविनिमय झाल्याचेही सांगण्यात येतंय. महाविकास आघाडीत 90/90/90 चा फॉर्म्युला चर्चेत आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात यावा, अशी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचा विचार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे. मातोश्रीवर आलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केलं. त्यांनी नुसती भेटच घेतली नाही तर त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.





