Maharashtra Politics : राजकारणात मोठी खळबळ! ६ खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक
Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी संसदेत स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी संसदेत स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांचा पुढील प्रवास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे होण्याची चर्चा सुरू असतानाच, उद्धव ठाकरे यांनी या घडामोडींना कायदेशीर आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील तीन खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना लेखी निवेदनही सादर केले. (Maharashtra Politics)
या भेटीत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. जवळपास २० मिनिटे झालेल्या चर्चेत संविधानातील तरतुदी आणि पक्षांतरासंदर्भातील कायदेशीर बाबींकडे लोकसभा अध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. (Maharashtra Politics)
भेटीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना, “संविधानातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. फुटीर गटाला मान्यता देण्यापूर्वी कायद्याचा आणि संविधानाचा सन्मान राखला गेला पाहिजे,” असे मत व्यक्त केले. (Maharashtra Politics)
तर खासदार अनिल देसाई यांनी, “कोणत्याही नव्या गटाला मान्यता देण्यापूर्वी आमची बाजू ऐकली जावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. विद्यमान कायद्यानुसार स्वतंत्र गट दुसऱ्या पक्षात थेट विलीन होऊ शकत नाही. त्यासाठी पक्षाच्या विलिनीकरणासंबंधी ठराविक घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करावी लागते,” असे सांगितले. (Maharashtra Politics)
दरम्यान, बंडखोर खासदारांविरोधात पुढील कायदेशीर कारवाईबाबतही ठाकरे गट सक्रिय झाला आहे. यासाठी खासदार संजय राऊत हे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर आणि राजकीय पावले उचलली जातात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
२ खासदारांचा शिंदेंसोबत जाण्यास नकार
दरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगत पक्षांतराच्या चर्चांचे खंडन केले आहे. (Maharashtra Politics)
राजाभाऊ वाजे यांनी माध्यमांशी बोलताना, “मी उद्धवजींसोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे. माझा इतर कोणाशीही संपर्क नाही. शिंदे गटाकडूनही कोणताही संपर्क झालेला नाही. मी नाराज नाही. समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलो आहे,” असे स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
दरम्यान, संजय दिना पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे देखील ठाकरे यांच्यासोबतच राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Maharashtra Politics)






