नगर: जिल्हा पोलीस दलातील सुमारे दोनशे पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. काही पोलिसांनी एकाच ठिकाणी प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे त्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही पोलिसांनी वैद्यकीय अडचणी, मुलांच्या शिक्षणाच्या कारणामुळे बदल्यांसाठी विनंती अर्ज केले होते. त्यानुसार रिक्त जागा पाहून त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह नियुक्त केलेल्या आस्थापना मंडळाने बदल्यांचे आदेश काढलेजिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, सहायक फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे दीडशे पोलिसांनी एकाच ठिकाणी तीन वर्षे नोकरीचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी इतर शहरांत, कौटुंबिक कारणास्तव, पालक किंवा कुटुंबातील कोणाच्या आजारपणामुळे विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेले होते.
सुमारे शंभर पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. गेले दोन ते तीन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरु होती. बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक आदींच्या आस्थापना मंडळासमोर पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. रिक्त जागांची शहानिशा करुन बदली दिली आहे. .