Shambhuraj Desai : राज्यात जनतेच्या सहभागातून पर्यटनाला मिळणार नवी दिशा; शंभूराज देसाई यांचा पुढाकार

विजय लाड / कोयनानगर : राज्यात पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून ‘पर्यटन दृष्टी २०४७नवी दिशा, नव्या संधी उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमातून राज्याच्या पर्यटन विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी जनतेचा थेट सहभाग घेतला जात असून पर्यटन विकास महामंडळ पर्यटनाच्यादृष्टीने नागरिकांचे अनुभव, अपेक्षा आणि कल्पना गोळा करत आहे.
पर्यटन दृष्टी २०४७ नवी दिशा, नव्या संधी हा उपक्रम केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरता मर्यादित नसून, तो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील पर्यटनाविषयीची स्वप्न आणि भावना जाणून घेण्यासाठीचा प्रयत्न आहे. कोकणातील निळसर किनारे, सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट, वारसास्थळे, धार्मिक केंद्रे, ग्रामीण आणि साहसी पर्यटनाच्या वारा या सर्व पैलूंचा समावेश या संकल्पनेत केला जात आहे.
पाबाबत पर्यटनमंत्री संभूराज देसाई म्हणाले, आजचा पर्यटक हा अनुभव शोधतोय. प्रवास करताना तो स्थळांबरोबरच संस्कृती, लोकजीवन आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवत असतो. महाराष्ट्र ही अनुभवांची प्रयोगशाला बनवण्याचं उद्दिष्ट या मोहिमेमागे आहे. राज्यभरातून सुरू असलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले गत नोंदवायचे आहे.
पर्यटन स्थळांचा सध्याचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि येणाऱ्या अडचणी, स्थानिकांचे आतिथ्य, माहिती मिळवण्याची सुलगता, सुरक्षिततेबाबतचा विद्यास, याशिवाय भविष्यातील दृष्टीकोन स्पष्ट करताना शाश्वत पर्यटन, डिजिटल अनुभव, सांस्कृतिक वारसा, वैद्यकीय पर्यटन, साहसी आणि तरुणांसाठी उपयुक्त मॉडेल्स यावर नागरीकांनी मत व्यक्त करायचे आहे. Shambhuraj Desai |
राज्यभर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटने, तसेच महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे पांचा समन्वय आहे.
राज्यात २०४७ च्या पर्यटनासाठी आजचा नागरिक हा भागीदार ठरत असून, शासनाने उचललेले हे पाऊल म्हणजे लोकशाहीतून चालणाऱ्या पर्यटन धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. पर्यटनाच्यादृष्टीने जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा या उपक्रमातून स्पष्ट होणार आहेत.
शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री
पर्यटनाच्यादृष्टीने केले जाणारे हे सर्वेक्षण म्हणजे नवा आरसा आहे. ज्यात महाराष्ट्राच्या पर्यटन भविष्याचे प्रतिबिंब दिसेल. हा आराखडा लोकसहभाग, नवकल्पना आणि पर्यावरणीय जाणीव यावर आधारित असेल. राज्य शासनाच्या पुढाकाराने, हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवला जात आहे.
मनोजकुमार सुर्यवंशी, व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी




